राजेंद्र पाटील राऊत
बँकांकडून पीक कर्जवाटपात होत असलेली शेतकऱ्यांची पिळवणूक थांबवा.- शिवशंकर पाटील कलंबरकर
नांदेड जिल्हा ब्युरो चीफ मनोज बिरादार (युवा मराठा न्यूज नेटवर्क)
गेल्या वर्ष-दोन वर्षापासून बँकेत पिककर्जाच्या फाईली प्रलंबित आहेत.बँकांकडून पीककर्ज वाटपात शेतकऱ्यांची मोठी अडवणूक व आर्थिक लूट होत असलेल्या तक्रारी मोठ्या प्रमाणावर आहेत.गरजू महिलांना छोटे व्यवसाय करण्यासाठी महिला बचत गटांना काही बॅंका कर्ज देत नाहीत.शेतकऱ्यांना कर्ज वाटपासाठी बँकांनी पीककर्ज मिळावा घेतला नाही.त्या बँकेवर कार्यवाही करा,अशी मागणी दि.13 जून रोजी जिल्हाधिकारी डॉ.विपीन ईटनकर यांच्याकडे निवेदनातून स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे शिवशंकर पाटील कलंबरकर यांनी केली आहे.
शेतकऱ्यांनी पिककर्जाची फाईल दिली.तेव्हा बँकेकडून शेतकऱ्यांना पोचपावती दिली जात नाही.त्यामुळे कोणत्या शेतकऱ्यांनी अगोदर फाईल दिली,हे समजत नाही.म्हणून बँकांना आर्थिक व्यवहार करून पीककर्ज वाटप करण्यासाठी वाव मिळतो.हे बंद करण्यासाठी शेतकऱ्यांना बँकेकडून पीककर्ज फाईलीची पोचपावती मिळाली पाहिजे.
गरजू व गरीब महिलांना छोटे व्यवसाय करण्यासाठी बँकेकडून बचत गटांना कर्ज मिळाले पाहिजे.काही बँका महिला बचत गटांना कर्ज देत आहेत.पण,काही बँका कर्ज देत नाहीत.महिलांना व्यवसायात उभे करण्यासाठी महिला बचत गटांना कर्ज वाटप झाले पाहिजे,अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे.