Home नांदेड बँकांकडून पीक कर्जवाटपात होत असलेली शेतकऱ्यांची पिळवणूक थांबवा.- शिवशंकर पाटील कलंबरकर

बँकांकडून पीक कर्जवाटपात होत असलेली शेतकऱ्यांची पिळवणूक थांबवा.- शिवशंकर पाटील कलंबरकर

45
0

राजेंद्र पाटील राऊत

IMG-20220613-WA0019.jpg

बँकांकडून पीक कर्जवाटपात होत असलेली शेतकऱ्यांची पिळवणूक थांबवा.- शिवशंकर पाटील कलंबरकर
नांदेड जिल्हा ब्युरो चीफ मनोज बिरादार (युवा मराठा न्यूज नेटवर्क)
गेल्या वर्ष-दोन वर्षापासून बँकेत पिककर्जाच्या फाईली प्रलंबित आहेत.बँकांकडून पीककर्ज वाटपात शेतकऱ्यांची मोठी अडवणूक व आर्थिक लूट होत असलेल्या तक्रारी मोठ्या प्रमाणावर आहेत.गरजू महिलांना छोटे व्यवसाय करण्यासाठी महिला बचत गटांना काही बॅंका कर्ज देत नाहीत.शेतकऱ्यांना कर्ज वाटपासाठी बँकांनी पीककर्ज मिळावा घेतला नाही.त्या बँकेवर कार्यवाही करा,अशी मागणी दि.13 जून रोजी जिल्हाधिकारी डॉ.विपीन ईटनकर यांच्याकडे निवेदनातून स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे शिवशंकर पाटील कलंबरकर यांनी केली आहे.
शेतकऱ्यांनी पिककर्जाची फाईल दिली.तेव्हा बँकेकडून शेतकऱ्यांना पोचपावती दिली जात नाही.त्यामुळे कोणत्या शेतकऱ्यांनी अगोदर फाईल दिली,हे समजत नाही.म्हणून बँकांना आर्थिक व्यवहार करून पीककर्ज वाटप करण्यासाठी वाव मिळतो.हे बंद करण्यासाठी शेतकऱ्यांना बँकेकडून पीककर्ज फाईलीची पोचपावती मिळाली पाहिजे.
गरजू व गरीब महिलांना छोटे व्यवसाय करण्यासाठी बँकेकडून बचत गटांना कर्ज मिळाले पाहिजे.काही बँका महिला बचत गटांना कर्ज देत आहेत.पण,काही बँका कर्ज देत नाहीत.महिलांना व्यवसायात उभे करण्यासाठी महिला बचत गटांना कर्ज वाटप झाले पाहिजे,अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे.

Previous articleजुन्ना येथील तलावात बुडून 13 वर्षीय मुलाचा मृत्यू
Next articleमहावितरण चा गलथान कारभार, विजेची तार तुटुन शेतातील शेडवर पडून 9 मुक्या जनावरांचा मृत्यू
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here