राजेंद्र पाटील राऊत
पावसाळ्यात विजयंञणेपासुन सावधान। , गडचिरोली,(सुरज गुंडमवार ब्युरो चीफ युवा मराठा न्युज नेटवर्क)
अनेक ठिकाणी वादळी पावसाने हजेरी लावली. अशावेळी आता येणाऱ्या पावसासोबत येणाऱ्या वादळ वार्यामुळे, संभाव्य अपघात टाळण्यासाठी विज यंञणेपासून खबरदारी घ्यावी.जिवितहानी टाळावी असे आवाहन महावितरण कंपनीने केले आहे.
अतिवृष्टी, वादळाने तुटलेल्या वीजतारा,बीजखांब,रस्त्याच्या बाजूचे फिडर पिलर,रोहिञाच्या लोंखंडी कुंपण,फ्युज बॉक्स तसेच घरातील ओलसर असलेले विद्युत उपकरणे, शेतीपंपाचा स्विचबोर्ड आदिकडे दुर्लक्ष केल्याने दुर्घटना होण्याची शक्यता जास्त असते.
मुसळधार पाऊस आणी वादळी वारा यामुळे झाळाच्या मोठ्या फांद्या तुटून वीजतारांवर पडतात. तसेच झाडे पडल्याने विजखांब वाकला जातो.परीणामी वीजतार तुटण्याचे प्रकार घडतात. त्यात विजप्रवाह असण्याची शक्यता असण्याने अशा तुटलेल्या, लोंबकळणार्या वीजतारा पासुन सावध राहावे. या तारांना हात लावण्याचा किंव्हा हटविण्याचा प्रयत्न करु नये, असे आवाहन महावितरणने केले आहे.