Home बुलढाणा कायदा सुव्यवस्था अबाधीत ठेवण्यासाठी पोलीस पाटलांनी जबाबदारी म्हणुन पाडावे कर्तव्य पार संग्रामपूर...

कायदा सुव्यवस्था अबाधीत ठेवण्यासाठी पोलीस पाटलांनी जबाबदारी म्हणुन पाडावे कर्तव्य पार संग्रामपूर तहसीलदार यांचे आव्हान

134

राजेंद्र पाटील राऊत

IMG-20220611-WA0103.jpg

कायदा सुव्यवस्था अबाधीत ठेवण्यासाठी पोलीस पाटलांनी
जबाबदारी म्हणुन पाडावे कर्तव्य पार

संग्रामपूर तहसीलदार यांचे आव्हान                       संग्रामपूर,(रविंद्र शिरस्कार शहर प्रतिनिधी युवा मराठा न्युज नेटवर्क)

महाराष्ट्र ग्राम पोलीस अधिनियम१९६७मधिल भाग १ कलम ६नुसार पोलीस पाटील पद आणि जबाबदारी ह्या बाबत विस्तृत मार्गदर्शन करताना पोलीस पाटलांनी आपल्या गावासाठी किती दक्ष असले पाहिजे ,शासनाच्या सुधारित धोरणानुसार पोलीस पाटील हे ग्राम दक्षता समितीचे पदसिद्ध सदस्य आहेत. त्यांनी गावातील कायदा व सुव्यवस्था सांभाळतांना स्थानिक सरपंच सदस्यांशी समन्वय ठेवायला हवे चोऱ्या ,अवैध झाडे तोड ,अवैध गौन खनिज तस्करी रोखण्यासाठी गावासाठी नेमुन दिलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांना तात्काळ माहिती द्यावी. वाहन मालकांच्या वेळोवेळी बैठका घेवुन त्या वाहना वरिल चालकांचा चालक परवान्यांसंबंधी माहिती गोळा केली पाहिजे शासनाच्या महसुलाची चोरी करणाऱ्यांना गावात अवैध व्यवसाय करुन कायदा सुव्यवस्था बिघडविणार्या व्यक्ती बाबत संबंधीत पोलीस अधिकार्यांना तात्काळ माहिती द्यावी पोलीस पाटील यांना असलेल्या अधिकार आदींसह अनेक विषयांवर मार्गदर्शन करतांना तहसिलदार वरणगावकर यांनी पोलीस पाटलांनी कायदा सुव्यवस्था अबाधीत ठेवण्यासाठी जबाबदारी म्हणुन कर्तव्य पार पाडावे असे आव्हाण तालुकास्तरीय पोलीस पाटील बैठकी दरम्यान केले यावेळी ठाणेदार उलेमाले, पोलीस उपनिरिक्षक श्रीकांत विखे तसेच तालुक्यातील गाव निहाय पोलीस पाटील उपस्थीत होते