राजेंद्र पाटील राऊत
विजेच्या लपंडावाने महावितरणच्या पावसाळ्यापूर्वी कामावर नागरीक चिंतेत
संग्राम पाटील तांदळीकर
मुखेड तालुका प्रतिनिधी
पावसाळ्याच्या तोंडावर मुखेड तालुक्यातील येवती सबस्टेन्स आर्तगत विज पुरवठा होत आणून हवेची थोडीशीही लहर आली की विज पुरवठा खंडीत होतो यामुळे येवती सबस्टेन्स आर्तगत गावाची नागरिक त्रस्त झाले आहेत लवकरच पावसाळा होणार आहे तरी विज वितरण कंपनीला जग येत नसल्याने पावसाळ्यापूर्वी कामावर प्रश्न चिन्ह निर्माण होत आहे दरवर्षी पावसाळा आला की विजेचा लपंडाव सुरू होतो पंरतु यावर आता पर्यंत कुठली ही उपाय योजना करण्यात आली नाही पावसाळा तोंडावर आल्याने सोसाट्याचा वाऱ्यामुळे झाडाच्या फांदीवर विधुत तारेवर पडुन विधुत तारा तुटण्याची शक्यता नाकारता येत नाही त्यामुळे महावितरणने याकडे लक्ष देऊन यावर उपाययोजना करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे पावसाळा आला कि येवती सब स्टेशन अंतर्गत वीजपुरवठा खंडित होतो वीज पुरवठा खंडित झाल्यानंतर तो पूर्ववत व्हायला बराच वेळ लागतो त्यामुळे नागरिकांचे विज नसल्यामुळे
त्रास सहन करावा लागतो ग्रामस्थ विजेच्या लपंडावामुळे हैराण झाले आहे या बाबत वारंवार तक्रार करूनही वितरण कंपनीने याकडे लक्ष देत नसल्याने नागरिकांमध्ये वीज वितरण कंपनी व संताप व्यक्त होत आहे विद्युत पुरवठा खंडित होऊन यांचे संभाव्य धोका टाळण्यासाठी महावितरणकडून दरवर्षी देखभाल-दुरुस्ती कमी केले जाते झाडाचा लहान फाटा तोडून टाकले दुरुस्ती कामे केली जाते तुटलेले रोहित्रची अर्थिंग तपासणे आदीसह मेंटनस चे काम करणे गरजेचे आहे परंतु पावसाळ्याला लवकरच सुरुवात होणार असताना वीज पुरवठा खंडित होत असल्यामुळे पावसाळ्यापूर्वी प्रश्नचिन्ह निर्माण झाला आहे