राजेंद्र पाटील राऊत
लोंबकळत जाणाऱ्या विद्युत तारा तात्काळ बदलवण्यात याव्यात ग्रामस्थांची मागणी
शत्रुघ्न काकडे पाटील:-ब्यूरो चिफ (युवा मराठा न्युज नेटवर्क)
(परभणी) जिंतूर :-तालुक्यातील कावी येथील रस्त्यावरील रहदारी बघता लोंबकळत जाणाऱ्या विद्युत तारा तात्काळ बदलवुन नविन पोल तसेच तारा पावसाळ्यापूर्वी बदलण्याची ग्रामस्थांची मागणी होत असुन तारांमुळे मोठे संकट टळले आहेत,कुठलीही अजुन जिवित हानी झालेली नाही,त्याठिकाणीं नेहमी वर्दळीचे स्वरूप दिसुन येते,लहान मुले खेळतात तारा अचानक तुटल्यास याला जबाबदार कोण असा प्रश्न ग्रामस्थांन समोर उभा राहतो,अन्यथा अपघातांस आमंत्रण देण्यासारखी परस्थिती उदभवु शकते, तसेच मोठे अवजड वाहन अगदी चालुच्या विज प्रवाह मुळे पेटण्याची ही दाट शक्यता आहे, काही दिवसांपूर्वी दुर्दैवी सकंट टळल्याचे नागरिकांडुन बोलतांना निदर्शरनास आले,बऱ्याच वेळेस नागरिकांचे या तारांमुळे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाल्याची नाराजी देखील होती,टी,व्ही,लाईट,पंखे,आदी,इलेक्ट्रोनिक वस्तुचे नुकसानीस पात्र नागरीक अगदी चिंताग्रस्त अवस्थेत आढळून आले, पावसाळ्यात नेहमी अजीर्ण तारांमुळे ३/४ दिवस लाईट चा लपंडाव देखील होतो ,तरी वरीष्टानी ही बाब लक्षात घेता पावसापुर्वी लोंबकळत जाणाऱ्या विद्युत तारा व अजीर्ण तारा तात्काळ दुरूस्तीची मागणी ग्रामस्थांच्या वतीने होत आहे.