राजेंद्र पाटील राऊत
भाग्य उजळले ,वरवट तेल्हारा रोड चे रखडलेले काम 4 वर्षानंतर पूर्ववत चालु संग्रामपूर,(रविंद्र शिरस्कार शहर प्रतिनिधी युवा मराठा न्युज)
संग्रामपूर तालुका मधील वरवट बकाल वरून तेल्हारा कडे जाणाऱ्या रोड चे 2017 मधील पॅकेज मध्यंतरी 3-4 वर्षांपासून स्थगित असलेले काम काल दिनांक 22मे पासुन पूर्ववत चालू झालेले आहे या दरम्यान काही महिने रस्ता खोदुन ठेऊन काम चालू झालेले होते मधातच काही लोकल अडचणींमुळे किंवा कंपनीच्या काही त्रुटींमुळे काम रखडले होते करीता प्रवासीयांना कित्तेक दिवस ना-ना प्रकारचा त्रास सहन करावा लागला,करीता अनेकदा शासन दरबारी निवेदने सुद्धा देण्यात आले होते
सदर कंपनी ठेका औरंगाबाद येथील सुधीर इन्फ्रा या कंपनीकडे २०१७ मध्ये दिला गेला होता रखडलेल्या मधील कालावधीत त्या कंपनीने तो ठेका हा तेथिलच दुसऱ्या एका क्लायंमअप कंपनीला देऊन काम पूर्ण करण्यास सांगितले मागील आठवड्यात या विषयावर चर्चा झाली आणि सदर रखडलेल्या रोडचे काम २२ मे ला सुरू करण्यात आले
त्यामुळे आता आपले भाग्य उजळले , असे आनंदमय वातावरण लोकचर्चेत दिसून येत आहे.