राजेंद्र पाटील राऊत
गाव तसं चांगल पण अनेक समस्यानी ग्रासलं
बुलढाणा जिल्हा प्रतिनिधी स्वप्नील देशमुख युवा मराठा न्युज
संग्रामपुर:-तालुक्यातील वानखेड गावा मध्ये “पोष्ट मन” चे रिक्त पद असतल्यामूळे नागरिकांना खूप त्रास होत असून फार मोठी गैरसोय होत आहे. तरी वानखेड येथील रिक्त पद लवकरात लवकर भरन्यात यावे अशी मागणी गावकऱ्यांकडून जोर धरत आहे. डाक विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी संबंधित गावकऱ्यांना होणाऱ्या त्रासाचि दखल घ्यावी व वानखेड येथील पोस्टमन अतिरिक्त पद लवकरात लवकर भरण्यात यावे *गाव तसं चांगलं पण अनेक समस्यानी ग्रासलं*
*वानखेड गाव ता. संग्रामपुर*
*वानखेड गाव संग्रामपुर तालुक्यातील एक मोठे गाव. गावची लोकसंख्या 15 हजार जवळपास.. येथे गाव लेव्हलवर शासकीय कार्यालय आहेत…. मात्र कर्मचारी मात्र नाही
*टपाल कार्यालय
डिजिटल युग प्रणालीत आजही टपाल खात्याचे अनन्य साधारण महत्व आहे. पोस्ट कार्ड, आंतरदेशीय कार्ड बंद झाला असला तरीही टपाल खात्याकडे शासनाने विवीध योजनेचे काम दिले… त्यामध्ये सुकन्या योजना पोस्ट पेमेंट बँक ,कँश व्यवहार ,आधार वाटप, निराधार वृध्दाचे पगार यासह अनेक प्रकारची कामे इथल्या कर्मचार्राला करावी लागतात मात्र कर्मचारी एक अन् तिही महीला…..अशी मागणी गावातील नागरिकांकडून होत आहे.