Home बुलढाणा पवित्र रमजान महिन्यात भारनियमन बंद करा अन्यथा आंदोलन – विलासराव देशमुख यांचा...

पवित्र रमजान महिन्यात भारनियमन बंद करा अन्यथा आंदोलन – विलासराव देशमुख यांचा विज कंपनीला इशारा

59
0

राजेंद्र पाटील राऊत

पवित्र रमजान महिन्यात भारनियमन बंद करा अन्यथा आंदोलन – विलासराव देशमुख यांचा विज कंपनीला इशारा

संग्रामपूर शहर प्रतिनिधी रविंद्र शिरस्कार
पवित्र रमजानच्या महिन्यात भारनियमन बंद करा, अन्यथा आंदोलन करण्याचा इशारा माजी संपर्क प्रमुख विद्यार्थी सेना विलासराव देशमुख यांनी आज दि. 21 एप्रिल रोजी विज वितरण कंपनी संग्रामपूर ला दिला आहे.
संग्रामपूर तालुका हा आदिवासी तालुका असून या तालुक्यात सर्वच सण- उत्सव सर्व धर्माची मंडळी सोबत साजरी करतात.
3 एप्रिल 2022 पासून मुस्लिम बांधवांचा पवित्र रमजान महिना सुरू झाला असून विज वितरण कंपनीकडून मागील 15 दिवसापासून भारनियमन सुरु केले आहे. या महीण्यात कडक ऊन आग ओकत आहे. त्यात भारनियमन करणे योग्य नाही. तिन एप्रिल पासून मुस्लिम बांधवांचे रोजा (उपवास) सुरू झाले आहे. या पवित्र महिन्यात मुस्लिम बांधवाना रोज सकाळी पहाटे 5 वाजता सहेरी (जेवण) करून उपवास करावा लागत असून 14 तासानंतर संध्याकाळी 7 वाजेदरम्यान इफ्तार म्हणजे उपवास सोडावा लागतो. या भारनियमनामुळे उपवास ठेवणाऱ्यांना खूप गर्मीचा त्रास होत आहे. पवित्र रमजान महिन्याच्या काळात भारनियमन बंद करावे अन्यथा आंदोलन करण्यात येईल.
संग्रामपूर तालुक्यात मागील काही महिन्यांपासून विज वितरण कंपनीचे कर्मचाऱ्यांनी विज ग्राहकाकडून विज बिलाचा तडाखा सुरू केला आहे. पवित्र रमजान महिना, गुडीपाडवा, रामनवमी, १४ एप्रिल रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती आदी सण- उत्सव काळात 8 तासाचे भारनियमन सुरू केल्याने मुस्लिम बांधव व इतर नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. विज वितरण कंपनीने सुरु केलेल्या भारनियमन चा निर्णय तात्काळ मागे घ्यावा अन्यथा तीव्र आंदोलन करण्यात येईल.

Previous articleशिवणे , कोंढवे , कोपरे व उत्तमनगर या चार गावांचा पाणी प्रश्न सुटला
Next article७५, आझादी का अमृत महोत्सव, निमित्य आज ग्रामीण रुग्णालय वरवट येथे घेण्यात आला आज ‘भव्य आरोग्य मेळावा ‘
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here