राजेंद्र पाटील राऊत
राष्ट्रीय क्षयरोग दुरीकरण कार्यक्रम उपराष्ट्रीय दाव्यांच्या पडताळणीसाठी सर्वेक्षण
मंगरुळपीर(रितेश गाडेकर तालुका प्रतिनिधी युवा मराठा न्युज नेटवर्क): राष्ट्रीय क्षयरोग दुरीकरण कार्यक्रमांतर्गत केंद्र सरकारने 2025 पर्यंत देश क्षयरोगमुक्त करण्याचे महत्वाकांक्षी धोरण निश्चित केले आहे. नवीन टीबी केसेस कमी करणे हा या कार्यक्रमाचा उद्देश आहे. अद्ययावत टीबी केसेसच्या आकडेवारीनुसार देशात टीबीच्या प्रमाणात बऱ्याच दृष्टीने तफावत आहे. जिल्हा पातळीवरून टीबी दूरीकरण्यासाठी करण्यात येणारे प्रयत्न देखील अनेक प्रकारचे आहेत. टीबी मुक्त जिल्हा म्हणून दर्जा मिळवल्यास त्यांना आर्थिक किंवा आर्थिकेतर बक्षीस देऊन गौरविण्यात येणार आहे. सण 2015 पासून व एसडीजीच्या नियमानुसार टीबी प्रसारणाचा दर 80 टक्के पेक्षा कमी करणे गरजेचा आहे. आरोग्य व कुटुंबकल्याण मंत्रालयाने या उपक्रमांतर्गत राज्य व जिल्हे अशा पुरस्कारासाठी दावे किंवा अर्ज मागविलेले आहेत.राष्ट्रीय क्षयरोग दुरीकरण कार्यक्रमांतर्गत राज्यातील उत्कृष्टकामगिरी करणाऱ्या 12 जिल्ह्यामध्ये वाशिम जिल्ह्याचा समावेश आहे. वाशिम जिल्हाने केलेल्या दाव्याची / अर्जाची पडताळणी करण्यासाठी केंद्रीय क्षयरोग विभागाने इंडियन कॉन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ एपीडीमियोलॉजी आयसीएमआर- एनआयई यांना अहवाल सोपविला आहे. जिल्ह्याने केलेल्या दावे पडताळणीसाठी बॅक्टेरियालॉजिकली पॉझिटिव्ह पलमोनरी क्षयरोगाचे प्रसारणाचा अंदाज घेणे व पूर्वी समाजात आणि सदस्यस्थितीत एटीटी अंतर्गतही पडताळणी करणे, तसेच जिल्ह्यातील सर्व तालुक्यात भारतीय वैद्यकीय संशोधन परिषद तसेच राष्ट्रीय क्षयरोग अनुसंधान केंद्र नवी दिल्ली या संस्थेकडून येणारे पथक हे सर्वेक्षण करणार आहे. यासाठी दहा चमुची निवड करण्यात आली आहे. सर्वेक्षण होणारी ठिकाणे पुढीलप्रमाणे. वाशिम मधील वार्ड क्रमांक 15 व सोनखास, मंगरूळपीर मधील वार्ड क्रमांक 3 व सेलगाव, रिसोड मधील वार्ड क्रमांक 10 व चिखली, मालेगाव मधील मुंगळा कारंजा मधील वार्ड क्रमांक 2 व उंबर्डाबाजार आणि मानोरा येथील देऊरवाडी ची निवड करण्यात आली आहे. निवडलेल्या खेड्यातील रहिवाशी व समुदाय यांचे सर्वेक्षण होणार आहे. निवडलेल्या समूह गाव / वार्ड मधील सर्व घरांची यादी मॅप केली आहे. सर्वेक्षण सुरू करण्यासाठी समावेशक निकष पद्धतीने नमुना निवड केली जाईल. सर्वेक्षणातील आरंभ बिंदूपासून कुटुंबांना गृहीत न धरता सर्वेक्षण सुरू केले जाईल. क्षयरोग निमंत्रण कार्यक्रमाला जिल्ह्यातील नागरिकांनी सहकार्य करून एकजुटीने हातभार लावावा यामुळे “टीबी हारेल,देश जिंकेल” असे आवाहन जिल्हाधिकारी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी तथा जिल्हा क्षयरोग निमंत्रण सोसायटीच्या अध्यक्ष वसुमना पंत यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.विजय काळबांडे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.सुहास कोरे व जिल्हा क्षयरोग निमंत्रण सोसायटीचे सदस्य सचिव तथा जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ. एस.व्ही. देशपांडे यांनी केले आहे.