राजेंद्र पाटील राऊत
ना. नवाब मलिक साहेबांवरील ‘ईडी’ने सूडबुद्धीने केलेली कारवाई तात्काळ मागे घ्या! जिंतूर चे माजी आमदार विजय भांबळे यांचे तहसिलदारांकडे निवेदन..
(शत्रुघ्न काकडे पाटील ब्युरो चीफ युवा मराठा न्युज नेटवर्क)
परभणीचे पालकमंत्री ना. नवाब मलिक साहेबांवरील कारवाई ही सूडबुद्धीने करण्यात आली आहे. केंद्र सरकारच्या इशाऱ्यावर चालणाऱ्या ‘ईडी’ने ही कारवाई हेतुपुरस्सर केली असून ती तात्काळ मागे घ्यावी, ही मागणी करत जिंतूर तहसीलदार यांना निषेधाचे निवेदन सोपविण्यात आले.
ना. नवाब मलिक साहेब महाविकास आघाडीचे महत्वपूर्ण नेते आहेत. ते सरकारमध्ये अल्पसंख्याक व वक्फ विकासमंत्री या नात्याने उत्कृष्ट कार्य करत आहेत. त्यांनी आजपर्यंत भाजपची अनेक काळी कृत्ये जनतेसमोर आणल्याने खवळलेल्या भारतीय जनता पक्षाने आता ‘ईडी’ची मदत घेत त्यांचे तोंड दाबण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत. मागील काळात अनेक भ्रष्ट अधिकाऱ्यांचे काळे धंदे त्यांनी उजेडात आणल्याने त्यांच्यावर मुद्दामहून अटकेची कारवाई करण्यात आली आहे.
आम्ही महाविकास आघाडीतील सर्व पक्ष ना. नवाब मलिक साहेबांच्या पाठीशी ठाम उभे राहू. देशात कोणत्या स्तराचे राजकारण केले जात आहे, याची जनतेला कल्पना आहे. या घाणेरड्या राजकारणाचा आम्ही निषेध करतो.
या संबंधीचे निवेदन यावेळी तहसीलदारांना सादर करण्यात आले. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.