Home विदर्भ भाजप च्या एटापल्ली महिला ता.अध्यक्षा तथा माजी पाणीपुरवठा सभापती सुनीता चांदेकर यांचा...

भाजप च्या एटापल्ली महिला ता.अध्यक्षा तथा माजी पाणीपुरवठा सभापती सुनीता चांदेकर यांचा काँग्रेस मध्ये प्रवेश जिल्हाध्यक्ष महेंद्र ब्राम्हणवाडे यांनी काँग्रेस पक्षाचा दुपट्टा टाकून केले पक्षात स्वागत

97
0

राजेंद्र पाटील राऊत

भाजप च्या एटापल्ली महिला ता.अध्यक्षा तथा माजी पाणीपुरवठा सभापती सुनीता चांदेकर यांचा काँग्रेस मध्ये प्रवेश

जिल्हाध्यक्ष महेंद्र ब्राम्हणवाडे यांनी काँग्रेस पक्षाचा दुपट्टा टाकून केले पक्षात स्वागत

गडचिरोली,(सुरज गुंडमवार ब्युरो चीफ युवा मराठा न्युज नेटवर्क):/ सामान्य गोरगरीब जनतेला अच्छे दिन चे आश्वासन देत 2014 पासून केंद्रात भाजप सरकार अस्तिवात आली पण सततच्या केंद्रातील अनियोजित नियोजनामुळे केंद्रातील सरकारने सामान्य जनतेचे जगने कठीण करून ठेवेल आहे. महागाई, बेरोजगारी नी वेग धरला असून ह्या अश्या जाचक व हुकूमशाही सरकार व पक्षाला सोडचिठ्ठी देत एटापल्ली नगरपंचायतच्या माजी नगरसेविका तथा पाणीपुरवठा सभापती व विद्यमान एटापल्ली भाजप महिला तालुका अध्यक्षा सौ. सुनीता मोहन चांदेकर यांनी पदाचा व पक्षाचा राजीनामा देत. जिल्हा काँग्रेस चे अध्यक्ष महेंद्र ब्राम्हणवाडे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून काँगेस पक्षात प्रवेश केला. जिल्हा काँगेस कार्यालय गडचिरोली येथे जिल्हाध्यक्ष महेंद्र ब्राम्हणवाडे यांनी काँग्रेस पक्षाचा दुपट्टा टाकून सुनीता चांदेकर यांचा पक्षात स्वागत केले.यावेळी प्रदेश काँग्रेस सोशल मिडया महासचिव नंदूभाऊ वाईलकर, जिल्हा सचिव तथा निवडणूक सल्लागार सुनील चडगुलवार, काँग्रेस नेते जितेंद्र मुनघाटे, संजय चन्ने आदी मन्यावर व काँग्रेस पदादाधिकारी यावेळी उपस्थित होते.

Previous articleपुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या सभागृहाचे काम गेल्या तीन वर्षापासून अपूर्ण.
Next articleअनाथ बालकांना बाल संगोपन व बाल न्याय निधीमधून लाभ
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here