राजेंद्र पाटील राऊत
विद्यार्थ्यांच्या शालेय पोषण आहारावर शासनाने दुर्लक्ष करू नये.
जळगाव जामोद(सतिश पाटील तालुकाप्रतिनिधी युवा मराठा न्युज नेटवर्क). :- विद्यार्थ्यांचे शरीर सुदृढ राहावे याकरता शासनाच्या वतीने शालेय पोषण आहार योजनेअंतर्गत नाविन्यपूर्ण उपक्रमांतर्गत राज्यातील योजनेस पात्र शाळांपैकी सर्व शासकीय शाळांमधील विद्यार्थ्यांना शालेय पोषण आहार मार्फत तांदूळ, हरभरा ,दाळ ,मुंगटी ,बाजरी आदी काही पोषण आहार विद्यार्थ्यांना पुरवण्यात येत होता.
परंतु गेली ३ महिन्यापासून शाळांमध्ये विद्यार्थ्यांना पोषण आहारामध्ये केवळ बिस्कीटच्या पुड्यांच्या व्यतिरिक्त कोणताही आहार देण्यात येत नाही.
त्यामुळे विद्यार्थ्यांना त्यांच्या हक्काचा शालेय पोषण आहार मिळावा व हे विद्यार्थी या आहारापासून वंचित राहू नये याकरता आज दिनांक १७ जानेवारीला काही विद्यार्थी पालकांसमवेत गट शिक्षण अधिकारी जळगाव जामोद यांच्या दालना मध्ये जाऊन त्यांच्याशी चर्चा केली.
यावेळी अक्षय पाटील, वैभव जाणे, अजय गिरी, अश्पाक भाई, विनोद पाटील उपस्थित होते.