Home कोकण शासकीय अध्यापक महाविद्यालय माजी विद्यार्थी मंडळाच्या नूतन कार्यालयाचा शुभारंभ

शासकीय अध्यापक महाविद्यालय माजी विद्यार्थी मंडळाच्या नूतन कार्यालयाचा शुभारंभ

179
0

राजेंद्र पाटील राऊत

शासकीय अध्यापक महाविद्यालय माजी विद्यार्थी मंडळाच्या नूतन कार्यालयाचा शुभारंभ
युवा मराठा l रत्नागिरी I २५ ऑक्टोबर
ब्युरो चिफ – सुनिल अनंत धावडे

रत्नागिरी- २००५ पासून सुरु झालेल्या शासकीय अध्यापक महाविद्यालयाच्या माजी विद्यार्थी मंडळाची उपयुक्तता लक्षात घेऊन व मंडळाचे चांगले कार्य पाहून शासकीय महाविद्यालयाचे माजी प्राचार्य डॉ शिंगारे यांनी एका वर्गात मंडळाच्या कार्यासाठी जागा उपलब्ध करून दिली होती.महाविद्यालयामध्ये नव्याने रुजू झालेल्या विद्यमान प्राचार्या डॉ रमा भोसले यांनी माजी विद्यार्थी मंडळाला महाविद्यालयाच्या प्रांगणातील स्वतंत्र वास्तू कार्यालयासाठी उपलब्ध करुन दिली. कार्यालयाचा शुभारंभ नुकताच प्राचार्या डॉ. भोसले यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आला.कार्यक्रमाच्या अध्यक्षा प्राचार्या डॉ भोसले यांनी फित कापून कार्यालय प्रवेशद्वाराचे उदघाटन केले.माजी विद्यार्थी मंडळाच्या नामफलकाचे अनावरण मंडळाचे अध्यक्ष रवींद्र इनामदार यांनी केले.कार्यकारिणी सदस्यांच्या नामफलकाचे अनावरण जेष्ठ सदस्य विनायक हातखंबकर यांनी केले.
माजी विद्यार्थी मंडळाच्या कार्यालयासाठी स्वतंत्र जागा देण्याचा निर्णय घेतल्याबद्दल नूतन प्राचार्या डॉ. रमा भोसले यांचा सत्कार विजय वाघमारे यांनी केला.कार्यक्रमासाठी असलेल्या माजी प्राचार्या डॉ.ज्योत्स्ना ठाकूर , डॉ रमेश भोसले, डॉ.राजश्री देशपांडे, प्रा चाकोते, प्रा. ढोणे मॅडम, श्री.मादगे, अनंत जाधव ,संदेश रहाटे यांनी मंडळाच्या कार्यासाठी शुभेच्छा दिल्या.माजी विद्यार्थी मंडळाचे अध्यक्ष रवींद्र इनामदार, जेष्ठ सदस्य विनायक हातखंबकर,विजय वाघमारे , डॉ रमेश भोसले, डॉ.राजश्री देशपांडे यांनी मनोगते व्यक्त केली.
प्राचार्या डॉ.रमा भोसले यांनी मंडळाच्या कामाचे कौतुक केले तसेच स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करावे आणि या मंडळाने अमृतनिधी किमान ७५०००/- पंच्याहत्तर हजार देणगीतून जमा करावा असे सूचित केले.या कामात माझे व माझ्या सहकाऱ्यांचे चांगले योगदान राहील असे सांगितले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मंडळाचे सचिव गणपती एडवी व डॉ. तारासिंह नाईक यांनी आभार मानले.

Previous articleस्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या विचारांनुसार जातीव्यवस्थेचे उच्चाटन होणे, ही राष्ट्रनिर्माणासाठी अत्यंत गरजेची बाब -राज्यपाल श्री.भगतसिंग कोश्यारी
Next articleपेट्रोल,डिझेल,गॅसच्या दरवाढीच्या विरोधात राष्ट्रवादी युवक काँग्रेस बाळापूर तालुक्याच्या वतीने केंद्र सरकारविरुद्ध आंदोलन   
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here