Home मुंबई मी मुख्यमंत्री बनून माझ्या वडिलांचं स्वप्न पूर्ण केलंय.. आपल्या मुलाच कल्याण केलत...

मी मुख्यमंत्री बनून माझ्या वडिलांचं स्वप्न पूर्ण केलंय.. आपल्या मुलाच कल्याण केलत साहेब…. दोनदा आरोग्य विभागाच्या परीक्षेत गोंधळ झालाय विद्यार्थ्यांचं कल्याण कोण करणार ? भाजपा नेत्या चित्रा वाघ यांनी साधला निशाणा.

134
0

राजेंद्र पाटील राऊत

मी मुख्यमंत्री बनून माझ्या वडिलांचं स्वप्न पूर्ण केलंय.. आपल्या मुलाच कल्याण केलत साहेब…. दोनदा आरोग्य विभागाच्या परीक्षेत गोंधळ झालाय विद्यार्थ्यांचं कल्याण कोण करणार ? भाजपा नेत्या चित्रा वाघ यांनी साधला निशाणा.

ठाणे (अंकुश पवार, ठाणे शहर प्रतिनिधी, युवा मराठा वेब न्युज चॅनेल)

मुख्यमंत्री काल म्हणालेत की मी मुख्यमंत्री बनून माझ्या वडिलांचं स्वप्न पूर्ण केलंय.. दोनदा आरोग्य विभागाच्या परीक्षेत गोंधळ झालाय. साहेब… राज्यातील विद्यार्थ्यांच्या वडिलांच्या स्वप्नांचा पण विचार करा ना.” असं चित्रा वाघ म्हणाल्या आहेत. शिवसेनेच्या दसरा मेळाव्यात काल शिवसेना पक्षप्रमुख व मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलेले भाषण वादळी ठरले. . त्यांच्या भाषणानंतर राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू आहेत. भाजपा नेते आक्रमक झाले असून, कालपासूनच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या भाषणावरून टीका, टिप्पणी सुरू आहे. दरम्यान, राज्यात पुन्हा एकदा आरोग्य विभागाच्या परीक्षांचा गोंधळ उडाला असून, यामुळे विद्यार्थ्यांना विविध अडचणींना सामोरं जावे लागत आहे. त्यामुळे आता अगोदरच कालच्या भाषणावरून संतप्त झालेल्या भाजपा नेत्यांनी हा परीक्षेतील गोंधळाचा मुद्दा देखील उचलून धरला आहे. भाजपा महिला आघाडीच्या नेत्या चित्रा वाघ यांनी या सर्व पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे यांच्यावर ट्विटद्वारे टीका केली आहे.

“तसेच, “मुख्यमंत्री कालच्या भाषणात गोंधळलेले दिसले, तीच परंपरा प्रशासनानं सुरू ठेवलीय. हे सरकार सलग दुसऱ्यांदा आरोग्य विभागाची परिक्षा घेण्यात नापास झालंय. सरकारी चुकीमुळे विद्यार्थ्यांना परीक्षा देता आली नाही त्यांना पुन्हा संधी द्यावी ही आमची मागणी आहे. भोंगळ कारभार, गोंधळी सरकार !” अशी टीका देखील चित्रा वाघ यांनी ठाकरे सरकारवर केली आहे.आरोग्य विभागातील परीक्षांमध्ये पून्हा हॉलतिकीट आणि केंद्र निवडीचा मुद्दा उपस्थित झाला आहे. त्यामुळे उमेदवारांना त्याचा नाहक त्रास सहन करावा लागत आहे. काळ्या यादीत समाविष्ट असणाऱ्या कंपनी यांना परीक्षा घेण्याचा अनुभव नसताना तसेच आरोग्यमंत्री यांनी जाहीर पणे न्यासा कंपनी परीक्षा घेण्यास सक्षम नसल्याचे सांगितले होते, तरी देखील त्याच कंपनीद्वारे परीक्षा घेण्याचा हट्टहास का केला? असा सवाल उपस्थित केला जात आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here