राजेंद्र पाटील राऊत
वाखारी ते देवळा रस्त्याची दुरावस्था ; सार्वजनिक बांधकाम विभागाचे दुर्लक्ष ;तात्काळ रस्ता दुरुस्ती करण्याची नागरिकांची मागणी
प्रतिनिधी : दादाजी हिरे वाखारी/युवा मराठा न्युज नेटवर्क
वाखारी ते देवळा रस्त्याची अक्षरशः दयनीय अवस्था झालेली आहे याकडे मात्र बांधकाम विभाग डोळेझाक करत आहे .
वाखारी रस्त्याची केलेली डाग डुगी पावसाच्या पाण्याने वाहून गेली असून रस्त्यात मोठं मोठे खड्डे झाले असून नागरिकांना प्रवासाला तारेवरची कसरत करावी लागत आहे. अनेक वाडी -वस्त्यांना जोडला जाणाऱ्या रस्त्याची चाळण झाली आहे .
या रस्त्यांची दुरुस्ती करण्यासाठी अनेक वेळा स्थानिक लोकप्रतिनिधी मागणी केली ,सहा महिन्यांपूर्वी गुंजाळनगर शहरा पुरता मर्यादित सहाशे मिटर रस्त्यांचे काम केले असून उर्वरीत काम तसेच रखडले आहे.
हा रस्ता तालुक्याच्या ठिकाणी ये जा करण्यासाठी महत्त्वाचा रस्ता आहे.दररोज आठ ते दहा गावातील लहान मोठे वाहने या रस्त्यावरून ये जा करत असतात गेल्या कित्येक वर्षांपासून या रस्त्याकडे सार्वजनिक बांधकाम विभागासह लोकप्रतिनिधीचे दुर्लक्ष झाले आहे ,त्यामुळे नागरिकांना खड्यातून रस्ता काढावा लागत आहे. रस्ता दुरुस्ती साठी अनेकदा मागणी करून देखील रस्त्याकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे.
बांधकाम विभाग तात्पुरता स्वरूपात या रस्त्याला पडलेल्या खड्यात मातीचा मुलाम देऊन वेळोवेळी आपली जबाबदारी झटकण्याचा प्रयत्न करीत असल्याचे चित्र या भागात पाहवयास मिळत आहे.
रोज छोटेमोठे अपघात घडत असून येथील भाजीपाला उत्पादकांना टोमॅटो ,कांदा ,मिरची ,कोबी शेतीमालाला स्थानिक बाजारपेठेत घेऊन जाण्याचा एकमेव मार्ग असल्याने भाजीपाला उत्पादक शेतकऱ्यांना माल घेऊन जाण्यासाठी रस्त्याच्या दुरवस्थेमुळे तारेवरची कसरत करावी लागत आहे.
लवकरात लवकर रस्त्यांचे काम करावे अशी मागणी नागरिकांनकडून केली जात असून अन्यथा आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे