Home मुंबई राष्ट्रीय महामार्गावर पत्रकारांना टोल माफी व ५ लाखाचा विमा

राष्ट्रीय महामार्गावर पत्रकारांना टोल माफी व ५ लाखाचा विमा

174

राजेंद्र पाटील राऊत

राष्ट्रीय महामार्गावर पत्रकारांना टोल माफी व ५ लाखाचा विमा

( विजय पवार महाराष्ट्र प्रतिनिधी युवा मराठा न्युज नेटवर्क)
राष्ट्रीय महामार्गावरून प्रवास करणाऱ्या महाराष्ट्रातील सर्व
पत्रकारांना टोल माफी , तसेच महामार्गावर प्रवास करत असताना मृत्यू आल्यास विमा कवच देण्यात येणार असल्याची घोषणा केंद्रीय रस्ते , वाहतूक मंत्री नितीन गडकरी यानी केली आहे.
सिंधूदुर्गजिल्ह्यातील आजी- माजी पत्रकारांचे शिष्टमंडळळाने केलेल्या मागणी वरून मंत्री गडकरी यांनी संपूर्ण राज्यासाठीच हा निर्णय घेतल्याचे सांगितले.
आमदार ,खासदार , मंत्री यांच्याप्रमाणेच पत्रकार समाजासाठी झटत असतात तसेच स्वतःचा जीव धोक्यात घालून काम करत असतात.
पत्रकार हा लोकशाहीचा चौथास्थंब म्हणून ओळखला जातो.
पत्रकारांना नेहमीच महामार्गावरून प्रवास करवा लागतो त्यामुळे महामार्गावरील टोलनाक्यावर टोल माफी मिळावी याकरीता सिंधूदुर्गमधील पत्रकारांच्या शिष्टमंडळाने माजी केंद्रीय मंत्री सुरेशा प्रभू यांच्या नेतृत्वाखाली मंत्री गडकरी यांची भेट घेतली. या भेटी दरम्यान पत्रकारांनी योग्य मागणी केली आहे हे पटवून दिल्यावर फक्त सिंधुदुर्रातील पत्रकारांनाच नाही तर राज्यातील सर्वत्र पत्रकारांना टोल माफीची घोषणा केली तसे आदेश काढण्याच्या सुचना देखील सचिवांना दिल्या आहे.तसेच महामार्गावर पत्रकाराचा अपघाती मृत्यू झाल्यास त्याला पाच लाखाचा विमाकवच देण्याची घोषणा केंद्रीय मंत्री गडकरी यांनी यावेळी केली. हि सवलत सर्वच पत्रकारांना सरसकट देण्यात येणार असल्याचेही यावेळी सांगितले .

Previous articleकोवीड रुग्णालयातील बेडची संख्या वाढवा गृहविलगीकरणातील रुग्णांची घरोघरी जावून तपासणी करा
Next articleकोव्हिड लसिकरणाचे जि.प.सभापती सौ.सुशिलाताई बेटमोगरेकर यांच्या हस्ते लोकार्पण…
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.