राजेंद्र पाटील राऊत
कबनुर येथे विज पडुन बैलाचा मृत्यु
पिडीत शेतकर्यांना प्रशासनाने तात्काळ मदत द्या रयत क्रांती संघटनेची मागणी.
मुखेड प्रतिनिधी मनोज बिरादार
मुखेड तालुक्यातील मौजे कबनुर येथील शेतकरी प्रकाश केशव इंगळे यांच्या बैलावर शुक्रवारी राञीला विज पडुन दुर्देवी मृत्यु झाल्याने परीसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
निसर्ग शेतकऱ्यावर कोपला असुन त्यातून शेतकरी अद्याप सावरला नाही तर आता निसर्गाने जनावरावर सुद्धा आपली अवकृपा दाखवली,गेल्यावर्षी म्हशीच्या निधन व त्या दुःखातून सावरले नाही तोच कालच्या रात्री मौजे कबनुर गावातील शेतकरी प्रकाश केशव पिंगळे यांच्या बैलावर वीज पडून दुर्दैवी अंत झाला आणी नांदेड जिल्हा मध्यवर्ती बँकेकडुन कर्ज घेवुन अवघड परीस्थितीतुन बैल घेतला होता.अगोदरच अतिवृष्टी व ढगफुटीने शेतात होत्याचं नव्हतं झालं आणि आता नैसर्गिक आपत्तींना विज पडुन मौजे कबनुर येथील प्रकाश केशव इंगळे यांच्यावर मोठे संकट ओढवले असून प्रशासनाने याकडे तात्काळ लक्ष घालून तात्काळ शेतकऱ्यांना मदत द्यावी अशी मागणी रयत क्रांती संघटनेचे नांदेड जिल्हाध्यक्ष बालाजी पाटील ढोसणे,सरपंच प्रतिनिधी रामदास वाघमारे,पंढरी कांबळे, उपसरपंच माधव टेभुर्णे यांनी केली.