Home मुंबई महविकास आघाडी सरकारला घरचा आहेर…..शिवसेनेचे समर्थक आमदार आशीष जयस्वाल यांनी केले गंभीर...

महविकास आघाडी सरकारला घरचा आहेर…..शिवसेनेचे समर्थक आमदार आशीष जयस्वाल यांनी केले गंभीर आरोप!

166
0

राजेंद्र पाटील राऊत

महविकास आघाडी सरकारला घरचा आहेर…..शिवसेनेचे समर्थक आमदार आशीष जयस्वाल यांनी केले गंभीर आरोप!

ठाणे:- ( अंकुश नारायण पवार, ठाणे शहर प्रतिनिधी,युवा मराठा न्यूज चॅनल )

उद्धव ठाकरेंनी सरकारमध्ये समावेश केल्याने मेलेल काँग्रेसवाले जिवंत झाले असं खळबळजनक वक्तव्य शिवसेनेचे समर्थक आमदार आशीष जयस्वाल यांनी केले आहे.
त्यामुळे आशीष जयस्वाल यांच्या या वक्तव्यामुळे महाविकास आघाडीतील नेत्यांमध्ये वाद होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. नागपूरमध्ये जिल्हा परिषदेच्या पोटनिवडणुकीच्या प्रचारादरम्यान आशीष जयस्वाल यांनी हे वक्तव्य केलं आहे.

“हे काँग्रेसचे लोकं. मेले होते तुम्ही, तुम्हाला कोणी विचारत नव्हतं. उद्धव ठाकरेंनी तुम्हाला सरकारमध्ये घेतलं म्हणून हे मेलेलं लोकं जिवंत झाले. नाहीतर यांच्या दोन्ही पक्षांमध्ये अशी गळती लागली होती की कुत्रं विचारायला तयार नव्हते. सर्व सुटकेस बांधून दुसऱ्या पक्षात जायला तयार होते. हे सर्व मेलेले लोकं जिवंत झालेले आहेत हे मी उघडपणे सांगतो,” असे आशीष जयस्वाल यांनी म्हटले आहे.
यामुळे आता नवीन वाद होण्याचे चिन्ह निर्माण झाले आहे.

Previous articleकीर्तनकार ताजुद्दिन महाराज शेख यांनी घेतलाअखेरचा श्वास … युवा मराठा न्यूज परिवारातर्फे भावपुर्ण श्रध्दांजली
Next articleकुठे किती पडलाय पाऊस जाणून घेऊया… जिल्ह्यातील ९ मंडळांत अतिवृष्टी!; शेतीचे प्रचंड नुकसान; वाहतुकीसह जनजीवन विस्कळीत
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here