राजेंद्र पाटील राऊत
वाघ,विंचू,साप,अस्वल जंगली जनावर चावल्याने मृत्यू झाला: सरकार देणार १० लाख रूपये……
मुंबई : (अंकुश पवार, प्रतिनिधी युवा मराठा न्यूज नेटवर्क)
महाराष्ट्र शासन वाघ,विंचू,साप,अस्वल जंगली जनावर चावल्याने मृत्यू झाला: सरकार देणार १० लाख रूपये देणार आहे. महसूल विभागाचा शासन निर्णय आपल्याला ही माहिती देणार आहे.
जर तुम्ही स्वतः किंवा तुमच्या पशुधन (गाय, मैस,बैल,शेळी, मेंढी,बकरी) इ. पशुधन वाघ,अस्वल,साप,विंचू चाऊन मृत्यू झाला किंवा व्यक्ती या जंगली जनावरं चावल्याने मृत्यू झाला/जखमी/अपंग झाला, तर महसूल व वन विभागाच्या शासन निर्णयानुसार तुम्हाला खालील लाभ मिळणार आहे:-
१. जर व्यक्ती मृत्यू/अपंग/जखमी झाला
व्यक्ती मृत झाला -१० लाख रुपये
व्यक्ती अपंग झाला – ५ लाख रुपये
व्यक्ती गंभीर जखमी झाला – १.५ लाख रुपये
व्यक्ती किरकोळ जखमी झाला – औषधोपचरासाठी लागणार खर्च केला जातो,मर्यादा २०,००० रुपये. शक्यतो औषधोपचार शासकीय /जिल्हा परिषद रुग्णालयात करावा.
२. जर पशुधन मृत्यू/अपंग/जखमी झाले
गाय, मैस,बैल यांचा मृत्यू झाला – बाजारभाव किंमतीच्या ७५% किंवा ४०,००० रुपये
मेंढी,बकरी व इतर यांचा मृत्यू झाला- बाजारभाव किंमतीच्या ७५% किंवा १०,००० रुपये
गाय, मैस,बैल यांना कायमचे अपंत्व आले – बाजारभाव किंमतीच्या ५०% किंवा १२,००० रुपये
वन्य प्राणी हल्यात मृत झालेल्या वक्तींचा वारसांना १० लाखाचे अर्थसहाय्य दिले जाईल परंतु ३ लाख रुपये तात्काळ चेक देला जाईल आणि उर्वरित ७ लाख रुपये वरासदराच्या राष्ट्रीयकृत बँकेत (FD) स्वरूपात जमा केले जातील.