राजेंद्र पाटील राऊत
अखेर मालेगाव येथील स्मशानभूमीच्या शेडची दुरुस्ती झाली
मालेगाव तालुका प्रतिनिधी प्रकाश भुरे /युवा मराठा न्युज
मालेगांव : – शहरातील आठवाडी बाजार रोडला येथील स्मशानभूमी तिल शेडची गेली अनेक वर्षांपासून दुर्दशा झाली होती ढासळलेल्या अवस्थेतील शेड अजून किती वर्षे मरण यातना सोसणार , असा प्रश्न मालेगांव शहरवाशीयांना पडला होता . त्याची ताबडतोब दुरूस्ती करण्यात यावी अशी मागणी ऋषिकेश सारस्कार यांनी नगर पंचायत कडे केली होती आणि लोकमत ने सुद्धा याबाबत वृत्त प्रकाशित केले होते अखेर आज ते काम पूर्ण झाले असून युवा मराठा च्या पाठपुराव्याला यश आले आहे.
दिवसे दीवस शहराची लोकसंख्या वाढत आहे वास्तविक शरहात 2 स्मशान भूमी ची गरज आहे सध्या च्या समशान भुमी मध्ये अंत्यसंस्कार ओटे अध्याप ही वाढवीन्यात आलेले नाहीत या स्मशानभूमी मध्ये ३शेड असून १ सीमेन्ट क्रॉग्रेड ने बाधंलेले आहे तर २ शेड अँगंल ने बनवीलेले आहेत या दोन्ही टीन च्या शेडला मोठे भगदाड पडले होते पावसाळा असल्या मुळे सर्व पावसाचे पाणी अंत्यसंस्कार ओटयावर पडतो त्यामुळे अंत्यसंस्कार विधीला आलेल्या शहरवासीयांना प्रेत भर पावसाच्या पाण्यातच मृतदेह जाळावे लागत आहे सध्याच्या परीस्थीतीमध्ये अंत्यसंस्कार वोट्या वरील टीनाची परीस्थीती बघता शेड ढासळण्याची भीती वाटत होती. स्मशानभूमीच्या दुर्दशेमुळे पावसाळ्यात व रात्रीअपरात्री अंत्यविधीच्या वेळी मालेगाव करानचे हाल होत आहेत सावडायला आल्यानंतर महिलांना , वृद्धांना , काही काळ का होईना पण त्रास सहन करावा लागतहोता . गावची लोकसंख्या 35000 ते 40000 असून गावात अनेक राजकीय मात्तबर आहेत . गावाने एकत्र येऊन नगरपंचायत सर्व राजकिय पक्षीय एकत्री केली आहे . असे असताना गेली पाच- सहा वर्षे स्मशानभूमी शेडची दुर्दशा का झाली , अशी चर्चा शहरवासी मध्ये होतहोती . लवकरात लवकर नगरपंचायतीने ढासळलेल्या स्मशानभूमी शेडची दुरुस्ती करावी , अशी मागणी ऋषिकेश सारस्कार यांनी केली होती अखेर या मागणी ची दखल घेत आज ते टिन दुरुस्ती चे काम पूर्ण झाले असून नागरिकांना दिलासा मिळाला आहे .