भाईजी फाऊंडेशन चा एक हात मदतीचा…. पूरग्रस्तांना पाठवली मदत
प्रतिनिधी युवा मराठा न्युज मालेगाव
भाईजी फाउंडेशन महाराष्ट्र राज्य तर्फे पुरग्रस्त कोकण वासीयांना 500 कुटुंबियांना जीवन आवश्यक वस्तु ची मदत मालेगांव भाईजी फाउंडेशन तर्फे पाठविण्यात आली. स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधत तसेच भाईजी फाउंडेशन वर्धापन दिना निमित्ताने मानवतेची सेवा हाच आमचा धर्म आसा विचार डोळ्यांसमोर ठेऊन आपले कर्तव्य समजुन 14 ऑगस्ट रोजी रात्री तिरंगा झेंडा दाखवत गाडी महाड व चिपळुनकड़े रवाना झाली.
१५ ऑगस्ट रोजी महाड येथे मंजरी, फार्मसी , वरन , दासगांव बौध्दवाडी, आदिवासीवाडी, चिपळुन ,पतरावाडी, टेंगर इत्यादी गांवामध्ये पूरग्रस्त नागरीकांना जीवनावश्यक लागणारे साहित्य, कपड़े ,किराणा या प्रकारचे भाईजी फाउंडेशन महाराष्ट्र राज्य मालेगाव तर्फे देण्यात आले.
समाजउपयोगी उपक्रमात मालेगाव शहरातील नावाजलेले इंडियन ब्युटीकचे संचालक केतन दत्तानी , समता परीषदचे धर्मा (आण्णा) भामरे, वंचित बहुजन आघाडीचे कपिल भाऊ आहिरे, व कल्पेश भाऊ सोनार आदित्य भाऊ निकम यूपी ट्रांसपोर्ट संचालक सागर खैरनार व मालेगांव शहरातील मान्यवरांकडून मोलाचे सहकार्य लाभले आहे.