राजेंद्र पाटील राऊत
सटाणा (शशिकांत पवार युवा मराठा न्युज नेटवर्क सटाणा प्रतिनिधी) -तालुक्यातील पिंगळवाडे येथे जोरदार वादळी वाऱ्यासह पाऊस झाल्याने प्रचंड प्रमाणात नुकसान झाले दुपारी दोनच्या सुमारास परिसरात अचानक वादळी वारे सुरू झाले त्यानंतर खूप जोराचा पाऊस होऊन अनेक ठिकाणी शेतकऱ्यांचे कांदा चाळीचे पत्रे उडाले, काही ठिकाणी शेतकऱ्यांचे घराचे पत्रे उडून प्रचंड प्रमाणात नुकसान झाले त्यामुळे अनेक कुटुंब व त्यांचा संसार पाण्यात बुडाला या वादळी पावसामुळे या ठिकाणातील टोमॅटो डाळिंब ची रोपे भुईसपाट झाली. एन उन्हाळ्यात शेतकऱ्यांनी थोडे थोडे पाणी वापरून जतन केलेली डाळिंब बाग भुईसपाट झाल्या पुन्हा या डाळिंब बागा चा बहार घेण्यासाठी शेतकऱ्यांना अजून एक वर्ष मेहनत घ्यावी लागेल व वाट बघावी लागेल
तसेच या परिसरात मोठ्या प्रमाणात द्राक्ष बागांची लागवड केली आहे या द्राक्ष बागांच्या देखील काही ठिकाणी मंडप कोसळले तसेच येथील शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात ओली तुरची तुर ची शेती केली जाते पण या वादळामुळे व पावसामुळे तूर पिकाचे देखील नुकसान झाले शेतकऱ्यांनी पाहिलेली स्वप्न काही क्षणात क्षणभंगुर होऊन या पावसात विरून गेली .अनेकांचे संसार उघड्यावर पडले होत्याचे नव्हते झाले असून मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे तसेच मोतीराम केदु भदाणे यांच्या शेताजवळ विजेचे खांब कोसळून पडला असून
सुदैवाने येथे कुठलीही जीवितहानी झाली नाही. झालेल्या नुकसानाचे पंचनामे करून तात्काळ शेतकऱ्यांना त्याची नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांकडून होत आहे.
“वर्षभरापासून पाण्याची कमतरता असताना देखील मी डाळिंब बाग फुलवली होती परंतु या वादळी पावसामुळे माझे लाखोंचे नुकसान झाले आहे तरी माझ्या बरोबरच आमच्या गावात गावातील व परिसरात खूप शेतकऱ्यांचे नुकसान झाले असून आम्हाला यांचे पंचनामे करून तात्काळ नुकसान भरपाई मिळावी” *__अर्जुन दावल* *भामरे* , नुकसानग्रस्त शेतकरी