Home नांदेड मुखेड तालुक्यातील उंद्री (प.दे.) येथे वादळी वाऱ्यामुळे घरावरील पत्रे उडून जाऊन महिलेचा...

मुखेड तालुक्यातील उंद्री (प.दे.) येथे वादळी वाऱ्यामुळे घरावरील पत्रे उडून जाऊन महिलेचा मृत्यू

624
0

राजेंद्र पाटील राऊत

मुखेड तालुक्यातील उंद्री (प.दे.) येथे वादळी वाऱ्यामुळे घरावरील पत्रे उडून जाऊन महिलेचा मृत्यू

मुखेड तालुका प्रतिनिधी मनोज बिरादार (युवा मराठा न्यूज नेटवर्क)
उंद्री(प.दे)ता.मुखेड येथे अंगावर घरावरील दगड पडून एका महीलेचा मृत्यू झाल्याची घटना ता.२९ मे च्या रात्री ८ च्या दरम्यान घडली आहे.मृत महिला ही उंद्री(प.दे) गावातील घरबांधकाम करणारे माधव वाघमारे यांची पत्नी आहेत.रंजनाबाई माधव वाघमारे(वय ३२) असं या मृत महिलेचं नाव आहे.रात्री आठच्या दरम्यान तुफान वादळी वारे,विजेच्या कडकडासह अचानक पाऊस सुरू झाला.वारे भयानक असल्या कारणाने याच दरम्यान घरावरील पत्रे उडून गेली,पत्रावर दगड ठेवण्यात आली होते.तेच दगड रंजनाबाई वाघमारे यांच्या डोक्यावर पडले. यात त्या गंभीर जखमी झाले.जखमी अवस्थेत देगलूर येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले .उपचारादरम्यान त्यांच्या म्रुत्यु झाला.घरातील संसार उपयोगी साहित्याची पावसाने मोठी नासधूस झाली आहे.या घटनेची माहिती मिळताच गावातील ग्रामपंचायत सदस्य राजु वाघमारे यांनी घराकडे धाव घेतली आणि रंजनाबाई वाघमारे यांना देगलूर येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले असता संबंधित डाँक्टरांनी म्रत घोषित केले.या घटनेमुळे गावात हळहळ व्यक्त होत आहे.त्यांच्या पश्चात पती,दोन मुल असा परीवार आहे.परिसरात रात्रीच्या सुमारास अचानक वारा वादळ सुरू होऊन विजेचा कडकडाटात मुसळधार पाऊस सुरु झाला.जवळपास एक तास विजेच्या कडकडाटामुळे नागरिक भयभीत झाले होते.

Previous articleअॅड.अविनाश काळे मराठी विषयात सेट परीक्षा उत्तीर्ण
Next articleसटाणा तालुक्यात बेमोसमी पावसाने शेतकरी बांधवाचे अतोनात नुकसान
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here