राजेंद्र पाटील राऊत
मुखेड तालुक्यातील उंद्री (प.दे.) येथे वादळी वाऱ्यामुळे घरावरील पत्रे उडून जाऊन महिलेचा मृत्यू
मुखेड तालुका प्रतिनिधी मनोज बिरादार (युवा मराठा न्यूज नेटवर्क)
उंद्री(प.दे)ता.मुखेड येथे अंगावर घरावरील दगड पडून एका महीलेचा मृत्यू झाल्याची घटना ता.२९ मे च्या रात्री ८ च्या दरम्यान घडली आहे.मृत महिला ही उंद्री(प.दे) गावातील घरबांधकाम करणारे माधव वाघमारे यांची पत्नी आहेत.रंजनाबाई माधव वाघमारे(वय ३२) असं या मृत महिलेचं नाव आहे.रात्री आठच्या दरम्यान तुफान वादळी वारे,विजेच्या कडकडासह अचानक पाऊस सुरू झाला.वारे भयानक असल्या कारणाने याच दरम्यान घरावरील पत्रे उडून गेली,पत्रावर दगड ठेवण्यात आली होते.तेच दगड रंजनाबाई वाघमारे यांच्या डोक्यावर पडले. यात त्या गंभीर जखमी झाले.जखमी अवस्थेत देगलूर येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले .उपचारादरम्यान त्यांच्या म्रुत्यु झाला.घरातील संसार उपयोगी साहित्याची पावसाने मोठी नासधूस झाली आहे.या घटनेची माहिती मिळताच गावातील ग्रामपंचायत सदस्य राजु वाघमारे यांनी घराकडे धाव घेतली आणि रंजनाबाई वाघमारे यांना देगलूर येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले असता संबंधित डाँक्टरांनी म्रत घोषित केले.या घटनेमुळे गावात हळहळ व्यक्त होत आहे.त्यांच्या पश्चात पती,दोन मुल असा परीवार आहे.परिसरात रात्रीच्या सुमारास अचानक वारा वादळ सुरू होऊन विजेचा कडकडाटात मुसळधार पाऊस सुरु झाला.जवळपास एक तास विजेच्या कडकडाटामुळे नागरिक भयभीत झाले होते.