Home मुंबई मुंडेवर खोटे आरोप करणाऱ्या रेणू शर्मावर तत्काळ गुन्हा दाखल करण्याची भाजपच्या चित्रा...

मुंडेवर खोटे आरोप करणाऱ्या रेणू शर्मावर तत्काळ गुन्हा दाखल करण्याची भाजपच्या चित्रा वाघ यांनी केली विश्वास पाटील नागरे यांचा कडे मागणी

206

राजेंद्र पाटील राऊत

मुंडेवर खोटे आरोप करणाऱ्या रेणू शर्मावर तत्काळ गुन्हा दाखल करण्याची भाजपच्या चित्रा वाघ यांनी केली विश्वास पाटील नागरे यांचा कडे मागणी

विशेष प्रतिनिधी – राजेश एन भांगे युवा मराठा न्युज नेटवर्क

मुंबई, दि.२३ – राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांना रेणू शर्माच्या प्रकरणात मोठा दिलासा मिळाला आहे.
धनंजय मुंडे यांच्या वर बलात्काराचा आरोप करणाऱ्या रेणू शर्मा या महिलेने त्यांच्या वरील तक्रार मागे घेतली.
काही दिवसांपूर्वी रेणू शर्मा या महिलेने धनंजय मुंडे यांच्यावर बलात्काराचा आरोप केला होता.
पण अचानक हा आरोप तिने मागे घेतला.
या प्रकारा नंतर भाजपा च्या प्रदेश उपाध्यक्ष चित्रा वाघ या आक्रमक झाल्या असून त्यांनी या संधर्भात मुंबई पोलीस सहआयुक्त विश्वास नांगरे पाटील यांची भेट घेतली आणि महत्त्वाची मागणी केली.
धनंजय मुंडें वर झालेला अत्याचाराचा आरोप धक्कादायक होता.
पण ज्या पद्धतीने तक्रार मागे घेतली गेली, ते देखील तितकंच धक्कादायक आहे, असं मत वाघ यांनी व्यक्त केलं होतं.
“मुंबई पोलिस सहआयुक्तांची भेट घेत खोटे आरोप करणाऱ्या रेणू शर्मा वर गुन्हा दाखल व्हावा ही मागणी केली.
हे प्रकरण मुंडे व रेणू शर्मा पुरते मर्यादित नसून यात योग्य कारवाई झाली नाही,
तर याचे दूरगामी परिणाम राज्यातील लेकी – बाळींना भोगावे लागतील.
त्यामुळे या प्रकरणी तात्काळ कारवाई व्हावी”, अशी मागणी केल्याचे ट्विट चित्रा वाघ यांनी केले.

Previous articleयुवकांनी भाजपात येवून स्वतःची ओळख निर्माण करावी ; अशोक कांबळ देगलूरकर
Next articleमाथेरानच्या रस्त्याला अधिकारी कोकरे यांचे नाव
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.