Home सामाजिक गेला तो जमाना “स्त्री ” होती फक्त “चुल अन मुल”च्या चक्रयुव्हात अडकलेली,...

गेला तो जमाना “स्त्री ” होती फक्त “चुल अन मुल”च्या चक्रयुव्हात अडकलेली, श्रीमती आशाताई बच्छाव यांनी स्वतः च आपली वाट निवडलेली!!           

164
0

आंशुराज पाटिल मालेगाव कार्यालय

FB_IMG_1678172365499.jpg

गेला तो जमाना “स्त्री ” होती फक्त “चुल अन मुल”च्या चक्रयुव्हात अडकलेली, श्रीमती आशाताई बच्छाव यांनी स्वतः च आपली वाट निवडलेली!!                          ८ मार्च २०२३ जागतिक महिला दिन!त्यानिमित झाकोळलेले मोती,ज्यांचे कार्य कधी समाजासमोर खरे अर्थाने पोहचलेच नाही.अशा संघर्षवादी,आयुष्याच्या वाटेवर काटेरी वाट तुडवत आपल्या कलागुणांनी आपलं अस्तित्व निर्माण करणाऱ्या महिलांचा सन्मान करण्याचा आजचा हा “जागतिक महिला दिन” त्यानिमित श्रीमती आशाताई बच्छाव यांच्या कार्याचा गुणगौरव आजच्या दिनी व्हावाच…या अनुषंगाने हा लेखनप्रपंच! नाशिकच्या मालेगांव तालुक्यातल्या व-हाणेसारख्या खेडेगावात आशाताईचा जन्म झालेला.शिक्षणाची खुप आवड आणि इच्छा असतानासुध्दा,”मुलीला जास्त शिकवू नये” या गावठी धोरणाप्रमाणेच आशाताईचे बालवयात लग्न करुन देण्यात आले.पुढे संसाराचे जोखड मानेवर पडल्यावर आशाताईच्या मनातील सुप्त इच्छा जागेवरच राहिल्यात.तरीही आशाताई मात्र हरल्या नाहीत.गरीबीचा संसार रेटत असतानाच,आपल्या अंगी असलेल्या सुप्त कलागुणांमुळे आशाताई आपल्या लहानग्या दोन मुलांचे भविष्य नजरेसमोर ठेऊन एखाद्या वाघिणीसारख्या लढत राहिल्या,परिस्थितीशी एकाकी झगडत राहिल्या.गरीबीची वाटचाल सुरु असतानाच आशाताईच्या पतीचे सन २००९ साली दुर्दैवाने अपघाती निधन झाले.आणि तेव्हा मात्र खरे बघता आशाताईवर मोठी जबाबदारी येऊन ठेपली.आई आणि बापाची भुमिका दोघही आशाताईनांच पार पाडतांना अगदी तारेवरची कसरत करावी लागली.संघर्ष काय असतो,जीवन जगताना काय अडचणी दुःख ,वाटयाला येतात.या सगळ्यांच अग्निदिव्यातून आशाताईना जावे लागले.घरचा प्रपंच आणि कुटूंबाचा उदरनिर्वाह भागविण्यासाठी आशाताईनी सन २००७ पासूनच मुंबईहून प्रसारीत होणाऱ्या सत्यवार्ता वृतपत्राच्या मालेगाव तालुका महिला प्रतिनिधी म्हणून काम करण्यास सुरुवात केलेली होती.त्यामुळे समाजात चालणाऱ्या चांगल्या वाईट गोष्टीचे आकलन व ज्ञान आशाताईना अवगत झाले.आशाताईच्या वृतपत्रीय कामकाजामुळे व अगोदरच सन २००५ सालापासून युवा मराठा वृतपत्राच्या मार्गदर्शक व सल्लागार म्हणून कार्यरत असलेल्या आशाताई सन २००९ पासून युवा मराठा वृतपत्राच्या आणि न्युज चँनलच्या व्यवस्थापकीय संपादक पदावर कार्यरत असून,त्यांनी आपल्या पदाला पुरेपुर न्याय देताना युवा मराठा च्या फेरबदलात अनेक आधुनिक फेरबदल घडवून आणण्यासाठी सातत्याने आपले बुध्दी कौशल्य वापरले आहे.तर आशाताईच्या पतीच्या निधनानंतर आशाताईना अनेक अडचणी,संकटे, दुःखाचा सामना करावा लागला आहे.”माझे माझे म्हटले जाणारे सख्खे रक्ताचे नातेही भ्रष्ट झालेत” सगळ्यांनी पाठ फिरविली.अन ढुंगणाला पाय लावून पळ काढला.आशाताई मात्र एकला चलो रे न्यायाने आयुष्याची लढाई लढतच राहिल्यात.आशाताईनी व-हाणेसारख्या गावात जिल्हा परिषदेच्या प्राथमिक मराठी शाळेला सलग पाच वर्षापर्यत आपल्या स्वर्गिय पती शांतीलाल (अप्पा) राघो बच्छाव यांच्या स्मरणार्थ गोरगरीब विद्यार्थ्यांना शालेय दप्तरे, वहया,पेनपाटी,पेन्सिल,घडयाळे यासारखेच विविध मदती दिल्यात.तर सन २०२० पासून गावातच मराठी शाळेजवळ गावठाण जागेवर युवा मराठा परिवाराच्या माध्यमातून स्वर्गिय शांतीलाल (अप्पा) राघो बच्छाव सार्वजनिक पाणपोई स्वखर्चाने चालवून पांथस्थ वाटसरु असलेल्या तहानलेल्यांना पाणी पाजण्याचे पुण्यकर्म सुरु ठेवले.तर आशाताईनी स्वतःच्या गावासह संपूर्ण महाराष्ट्रात विधायक व सामाजिक कार्य करता यावे म्हणून “आश्रयआशा फाऊंडेशन”या संस्थेची स्थापना केली.आशाताई स्वतः या संस्थेच्या संस्थापक सचिव म्हणून कार्यरत आहेत.आश्रयआशा फाऊंडेशन या संस्थेच्या माध्यमातून कौळाणेजवळील देवी मळाच्या शाळेतल्या विद्यार्थ्यांना वहया वाटपसारखा कार्यक्रम आशाताईनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंती दिनी व्यशस्वी करुन दाखविला.तर मालेगांव सारख्या शहरात रस्त्यावर फिरणा-या गोरगरीब निराधार महिलांना साडया व थंडीसाठी ब्लँकेट वाटप करण्यासारखे सामाजिक कार्य फाऊंडेशनच्या माध्यमातून प्रत्यक्षात साकारले.तर आज आठ मार्च दरवर्षी जागतिक महिला दिनानिमित विविध तळागाळातल्या महिलांचा सन्मान करुन पुरस्कारीत करण्याचा कार्यक्रम यावर्षी मात्र काही तांत्रिक कारणास्तव मार्च अखेरीस पार पडणार आहे.तर आशाताईच्या कार्याचा जयघोष संपूर्ण महाराष्ट्रभर कौतुकप्रिय ठरत आहे.आशाताईच्या जीवनात अनेक मान सन्मानाचे योग आलेत,त्यात मुंबई येथे सरीता पाटकर यांच्या हस्ते सन्मानीत करुन गौरविण्यात आले.येवला येथे पोलीस निरीक्षक प्रिया थोरात यांनी सत्कार केला.साल्हेरला आदीवासी महिलांनी पारंपरिक पध्दतीने सन्मानीत केले.तर ठेंगोडा गावी ग्रामपंचायतीने सत्कार केला.त्याशिवाय मालेगांवच्या तत्कालीन तहसिलदार श्रीमती ज्योती देवरे यांनी पुरस्कार देऊन गौरव केला.त्याशिवाय कोरोना काळात केलेल्या उत्कृष्ट कामगिरीचा सन्मान म्हणून नागपूरच्या ग्लोबल एकता फाऊंडेशन या संस्थेकडून चांदीचे मेडल व सन्मानपत्र देऊन आशाताईचा सन्मान करण्यात आला.अशा पध्दतीने एक ग्रामीण गृहीणी ते व्यशस्वी महिला म्हणून आशाताईचा कार्यालेख संपूर्ण महाराष्ट्रात नावलौकिकास पात्र ठरला आहे.एकेकाळी जवळ न येणारे जवळचे नातलगही आता आशाताईच्या जवळ येऊन त्यांचे मार्गदर्शन घेतात.व त्यांना आपलेसे म्हणतात,हिच खरी संघर्षवादापासून सुरु झालेली चळवळ आज यशोशिखरावर जाऊन पोहचली आहे.आशाताईच्या कार्याला “युवा मराठा” चा आजच्या महिला दिनी मानाचा मुजरा! ….महिलादिन विशेष/ आंशूराज पाटील राऊत….

Previous articleकौळाणेतील रेशन व्यवस्थेचे तीन तेरा नऊ बारा;मर्जीतल्या व्यक्तीला दुकान दिल्याचा फटका बसतोय ग्राहकांना…!
Next articleती लढली संकटांशी आणि जिंकली लढाई आयुष्याची…
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here