Home राजकीय लोकशाहीत प्रामाणिक माणसाची किंमत राहिलीच काय…?

लोकशाहीत प्रामाणिक माणसाची किंमत राहिलीच काय…?

131
0

राजेंद्र पाटील राऊत

संपादकीय अग्रलेख…!

लोकशाहीत प्रामाणिक माणसाची किंमत राहिलीच काय…?
वाचकहो,
आज महाराष्ट्रातल्या विविध ग्रामपंचायतीचा निकाल ऐकून धक्काच बसला.लोकशाहीत प्रामाणिक माणसाला किंमतच राहिली नाही.हे बघावयास मिळाले.आदर्श गाव पाटोद्याचे नाव संपूर्ण देशपातळीवर पोहचविणा-या भास्करराव पेरे पाटलांच्या पँनलला दारुण पराभव पत्कारावा लागला.हे कशाचे द्योतक म्हणायचे?
प्रामाणिकपणे व इमानदारीने गाव विकासासाठी त्याग करुन खस्ता खाणा-या व्यक्ती या मतदार राजा म्हटल्या जाणाऱ्या नागरिकांना चालतच नाहीत हेच यावरुन सिध्द झाले.
निवडणुका तरी कोण लढतंय ,चोर भामटे लफंगे,वाळू माफीया,रेशन माफीया,अवैध बांधकामे करणारे अतिक्रमण वाढवणारे,लोकांच्या जागा बळकावणारे हेच जर मतदारांच्या नजरेत आँयडाल असतील,तर लोकशाहीत सच्चाई व प्रामाणिकेतला कुठलेच महत्त्व उरणार नाही.आणि मग गावाचा विकास होण्याऐवजी भकासतेकडे गावा गावाची वाटचाल सुरु होईल.कुठे या लोकशाहीचे पावित्र्य नष्ट करण्यासाठी लिलाव होतो,तर कुठे निवडणूकात दलितांना उमेदवारी पासून पध्दतशीरपणे डावलले जाते.हे सगळ काय आहे?
तर निवडणुकांच्या नावाखाली गुंड पुंड वाढवायचे आणि मग त्यांनीच विकासाच्या नावाखाली गावाचे तीनतेरा नऊ बारा वाजवायचे.आज आदर्श गाव म्हणून मिरविणारी बहुतांश गावे अशी आहेत की,तेथे शौचालयाची धड व्यवस्था नाही,पिण्याला मुबलक पुरेसे पाणी नाही,अतिक्रमणाने गावच्या गावे गिळून टाकलीत.मग कुठे आहे विकास?फक्त स्वतःच्या मतलब व स्वार्थासाठी या निवडणूका लढवायच्या मतदार राजा असलेल्या नागरिकांच्या डोळ्यात धुळ फेकून…हा गैरप्रकार ज्या दिवशी थांबेल प्रामाणिकपणे काम करणारी माणस सतेत येतील त्याच दिवशी लोकशाही खरे अर्थाने मोकळा श्वास घेईल.एव्हढेच!

Previous articleग्रामपंचायत निवडणूकीत संवदगावला युवा मराठाचे प्रतिनिधी जगदिश बागूल यांच्या पत्नी विजयी!
Next articleहिप्परगा माळ ता.बिलोली येथील ग्रामपंचायतीवर ग्रामविकास परिवर्तन पँनलचे वर्चस्व..
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here