Home उतर महाराष्ट्र सरपंचपदासाठी ४२ लाखांची बोली, नंदुरबारमधील ‘या’ गावाची का होतेय चर्चा..? लिलावाव्दारे सरपंचपद...

सरपंचपदासाठी ४२ लाखांची बोली, नंदुरबारमधील ‘या’ गावाची का होतेय चर्चा..? लिलावाव्दारे सरपंचपद म्हणजे लोकशाहीची विटंबना!

95
0

राजेंद्र पाटील राऊत

सरपंचपदासाठी ४२ लाखांची बोली, नंदुरबारमधील ‘या’ गावाची का होतेय चर्चा..? लिलावाव्दारे सरपंचपद म्हणजे लोकशाहीची विटंबना!

नंदुरबार,(युवा मराठा न्युज नेटवर्क)
नंदुरबार जिल्ह्यातील खोंडामळी येथील वाघेश्वरी माता देवीवर श्रद्धा आणि एकदा तरी सरपंचपद घरात यावे यासाठी गावातील मंदिराला तब्बल ४२ लाख रुपयांची देणगी देऊन ५ वर्षांसाठी ग्रामपंचायत सांभाळण्याची तयारी येथील प्रदीप वना पाटील यांनी दर्शविली.

अशी’ लागली सरपंचपदाची बोली

खोंडामळी येथील ग्रामपंचायत निवडणुकीतील हा लिलाव सध्या चर्चेचा विषय ठरला आहे. साधारणत: ५ हजार लोकसंख्येच्या या ग्रामपंचायतीची निवडणूक जाहीर झाली आहे.

४ प्रभाग आणि १३ सदस्य असलेल्या या गावात यंदा निवडणूक बिनविरोध करावी, असे काहींचे म्हणणे पडले. त्यासाठी गावातील वाघेश्वरी माता मंदिर उभारणीला जो जास्त देणगी देईल त्याच्याकडे ग्रामपंचायत सुपूर्द करावी, असे ठरविण्यात आले.

सर्व पक्षांकडून २५ लाखांपासून ३८लाखांपर्यंत बोली गेली. ग्रामपंचायत एकदा तरी आपल्या ताब्यात यावी आणि सरपंचपद आपल्या घरात यावे यासाठी प्रदीप वना पाटील यांनी इच्छा व्यक्त केली.

राष्ट्रवादी काँग्रेसचे असलेले पाटील यांना पक्षाचे जिल्हाध्यक्ष डॉ. अभिजित मोरे यांनीही प्रोत्साहन दिले, आणि ४२लाखांवर त्यांनी बोली लावून ती अंतिम केली. या पैशातून मंदिराची उभारणी केली जाणार आहे.

तसेच, पाटील हे ठरवतील तेच सदस्य बिनविरोध घेतले जाणार आहेत. त्यांना ४ अपत्ये असल्याने ते स्वत: किंवा त्यांच्या पात्र ठरू शकणार नाहीत. त्यामुळे त्यांच्या मुलीला सरपंचपदावर विराजमान करावे लागण्याची शक्यता आहे. गावातील काही घटकांनी याला आक्षेप घेतला. परंतु गाव विकासासाठी व गावाच्या एकीसाठी त्यांचाही विरोध मावळेल अशी अपेक्षा ग्रामस्थांनी व्यक्त केली. उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवसापर्यंत आणखी काय घडामोडी घडतात याकडे आता लक्ष लागून आहे.  यानिमिताने एक प्रश्न उभा राहतो तो असा की,या जिल्ह्यातील प्रशासन व निवडणूक आयोगाची पथके नेमकी कोणती जबाबदारी पार पाडीत आहेत.जर लिलावाव्दारेच सरपंचपद मिळणार असेल तर लोकशाहीतल्या निवडणूक प्रणालीला कुठलाही अर्थ उरणार नाही.व देशाचे पंतप्रधान पद देखील मग लिलावाव्दारेच मिळणार का?असाही सवाल या खोंडामळीच्या घटनेतून निर्माण होत आहे.

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

Previous articleग्रामपंचायतींमध्ये कॉंग्रेस आणि महाविकास आघाडीची सत्ता
Next articleबोलके छायाचित्रे “
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here