राजेंद्र पाटील राऊत
विजयदुर्ग किल्ल्याची तटबंदी व बुरजाचे काम लवकरच सुरू
स्वराज्यातील आरमाराचे प्रमुख शक्तिकेंद्र असलेला महत्वाचा जलदुर्ग काळाच्या ओघात विदीर्ण अवस्थेत पोहचला असल्याचे काही शिवभक्तांनी खा. संभाजीराजे यांच्या लक्षात आणून दिले त्यामुळे लवकरच विजयदुर्ग किल्ल्याची तटबंदी व बुरजाचे काम सुरू करण्यात येणार आहे. याबाबतची माहिती खा. संभाजीराजे छत्रपती यांनी दिली आहे.
शिवछत्रपतींनी पुनर्बांधणी करून घेतलेला मराठा आरमाराच्या प्रमुख शक्ती केंद्रापैकी एक असलेल्या ‘विजयदुर्ग’ किल्ल्याची तटबंदी समुद्राच्या लाटांनी झिजली असून बुरुजचा भागही ढासळत असल्याचे निदर्शनास आले होते. छत्रपती संभाजीराजेंनी विजयदुर्ग गडाला ऑगस्ट महिन्यात भेट देऊन पाहणी केली होती.
गडाची पाहणी केल्यानंतर संभाजीराजे यांनी केंद्रीय सांस्कृतीक मंत्री प्रल्हादसिंह पटेल यांना समक्ष भेटून गडाच्या सद्य:परिस्थिती लक्षात आणून दिली. तसेच लवकरच तटबंदीचे, व बुरुजाचे काम सूरु करण्यासाठी आवश्यक ती कार्यवाही करावी अशी मागणी केली होती.
यासंदर्भात नुकतेच मुंबई पुरातत्व कार्यालयाकडून संभाजीराजे यांना पत्र प्राप्त झाले असून लवकरच गडावर संवर्धनाचे काम सुरु करण्यात येणार आहे. तसेच या कामासाठी दिल्लीतील डी.जी.पुरातत्व सर्वेक्षण कार्यालयाकडून सुध्दा मान्यता मिळाली आहे.
युवा मराठा न्यूज नेटवर्क .