Home Breaking News पालिका चौकातील स्व.आबांच्या पुथळ्याचे सुशोभितकरणाचे काम रखडले

पालिका चौकातील स्व.आबांच्या पुथळ्याचे सुशोभितकरणाचे काम रखडले

139
0

 

पेठ वडगांव : स्व.बळवंतराव यादव (आबाजी) वडगांव नगरीचे माजी.नगराध्यक्ष आणि वडगांवचे जनकल्याणकारी , आदरनीय आबांच्या वाड्यात पुर्वी कुणावरही अन्यान न होता न्यायनिवाडा होत असे.
आदरणीय आबांचा जन्म इ.स.१९१३ साली , आणि मृत्यू इ.स.२७-१०-१९७६ साली. वयाच्या ६३ व्या वर्षी आबांचा स्वर्गवास झाला.
यांच्या स्वातंत्र्य काळात गोरगरीब शेतकऱ्यांच्या शेतमालाला हमी भाव मिळावा यासाठी वडगांवमधे बाजार कमिटी उभा केली.
स्व.आबांनी दुसऱ्या महायुद्धाच्या काळात अन्नाचा तुटवडा झाला होता,
त्या काळी स्वतः आबांनी जनतेची उपासमार होऊ नये म्हणून खुले धान्य विक्रीस परवानगी दिली होती.
त्या काळी स्व.आंबाच्या वाड्यात समजातील वाद विवाद , भाऊबंदकीचे भांडणे याचा न्याय निवाडा देखील ह्वायचा,
त्यांचा न्याय कुणावरही अन्याय होणार नाही याची दखल घेतली जायची.
असे हे पुण्यवान , गोरगरिब जनतेचे जनक , यांनी जनकल्याणासाठी आपले संपूर्ण जीवन व्यतीत केले.
काळांतराने इ.स.२७-१०-१९७६ रोजी आबांचा स्वर्गवास झाला त्यांच्या दहननावेळी स्मशान भुमितच आबांचा पुतळा चौकात उभा करण्याचा निर्णय आण्णासाहेब चौगुले यांनी घेतला गेला .
त्यावेळी पुतळा कमिटीचे अध्यक्ष आण्णासाहेब चौगुले व सचिव मन्सुर मोमिन यांनी लक्ष घालुन १९७७ साली स्व.आबांच्या पुतळ्याचे अनावरण केले होते.
सद्या शहराच्या मध्यभागी पालिका चौकात आबांच्या पुतळ्याचे सुशोभित करणाचे काम सुरू असुन ते सद्या कोरोनामुळे रखडले होते.
सद्या कोरानाचा संसर्ग कमी झाला असुन सर्वच व्यापार व इतर सुवीधादेखील चालु झाल्या आहेत,
तसेच स्व.आबांच्या पुतळ्याचे सुशोभित करणाचे रखडलेले काम आता तात्काळ पुर्ण करावे अशी जेष्ठ नागरीकातुन मागणी होत आहे.
गोरगरिब जनतेचे कैवारी , लोकनेते , जनकल्याणकारी , माजी.नगराध्यक्ष स्व. बळवंतराव यादव (आबांचा) पुतळा सुशोभितकरण होणे गरजेचे आहे.

Previous article*कौळाणे- व-हाणे पत्रकार भवन जागा प्रश्नी अक्षम्य निष्काळजीपणा*
Next articleगुटखा तस्करी करणाऱ्या युवकास इचलकरंजीत रंगेहाथ पकडले
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here