Home Breaking News *प्रलंबित समस्या मार्गी लावण्याचे मुख्याधिकाऱ्यांचे इनामला आश्वासन*

*प्रलंबित समस्या मार्गी लावण्याचे मुख्याधिकाऱ्यांचे इनामला आश्वासन*

141
0

*प्रलंबित समस्या मार्गी लावण्याचे मुख्याधिकाऱ्यांचे इनामला आश्वासन*

*युवा मराठा न्यूज*

इचलकरंजी नगरपालिकेतील भ्रष्ट कारभार आणि असंवेदनशील बनलेले कारभारी ,प्रशासन यांच्याविरोधात आज गुरुवारी इचलकरंजी नागरिक मंचच्या वतीने इचलकरंजी नगरपालिकेच्या प्रवेशव्दारासमोर एक दिवशीय अन्नत्याग आंदोलन करण्यात आले. या आंदोलनाला नगराध्यक्षा यांनी भेट दिली व विविध राजकीय पक्ष ,सामाजिक संघटना ,संस्था आणि जागरुक नागरिकांनी पाठिंबा दर्शवला.
इचलकरंजी नगरपालिकेतील भ्रष्ट कारभारामुळे शहरातील अनेक विकासकामांना मोठ्या प्रमाणात खीळ बसली आहे. याशिवाय कारभारी मंडळींकडून होणाऱ्या हस्तक्षेपामुळे कामांचा दर्जाही घसरला आहे. त्यात लोकप्रतिनिधी आणि प्रशासनामध्ये समन्वयाची भूमिका नसल्याने कोणत्याच विकासकामांच्या तक्रारीचे गांभीर्य घेत जातले नाही. त्यामुळे ब-याचदा वादावादीचे प्रसंग उदभवून कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होतो.यातूनच आपल्या मुलभूत न्याय हक्कासाठी नागरिकांना लोकशाहीच्या मार्गाने आंदोलन ,मोर्चे काढण्याची वेळ आली आहे.ब-याचदा शहरातील विकासकामांसाठी सामाजिक कार्यकर्ते सातत्याने पालिका प्रशासनाकडे पाठपुरावा करतात. पण ,त्यांच्या तक्रारीकडे दुर्लक्ष करण्यात कारभारी आणि प्रशासन धन्यता मानतात , हा आजपर्यंतचा वाईट अनुभव आहे.पालिकेतील भ्रष्ट कारभाराचा परिपाक म्हणजेच नुकताच सामाजिक कार्यकर्ते नरेश भोरे यांनी आपल्या तक्रारीची पालिका प्रशासनाकडून दखल घेतली जात नसल्याच्या नैराश्यातून आत्मदहन केले.
पालिकेतील भ्रष्ट कारभार आणि असंवेदनशील बनलेले कारभारी,प्रशासन यांच्या विरोधात आज गुरुवारी इचलकरंजी नागरिक मंचच्या वतीने अन्नत्याग आंदोलनात आप्पासाहेब पाटील,अमितकुमार बियाणी,सुहास पाटील, चंद्रशेखर कोष्टी,धैर्यशील कदम,अमोल ढवळे,अभिजित पटवा यांनी सहभाग घेतला.
इचलकरंजी नगरपरिषदेत मुख्याधिकारी व नगराध्यक्षा यांना सामाजिक कार्यकर्त्यांचे प्रलंबित अर्ज त्वरित मार्गी लावावेत व कारभार सुधारण्याबाबत निवेदन देण्यात आले.त्यावर मुख्याधिकारी यांनी संदर्भीय पत्रास अनुसरून प्रलंबित समस्या निदर्शनास आणून दिल्यास तात्काळ मार्गी लावण्याचे लेखी पत्र दिले.सदर समस्यांसाठी आढावा बैठकीची मागणी इनामतर्फे करण्यात येऊन अन्नत्याग आंदोलनाची सांगता करण्यात आली.
आंदोलन यशस्वी होण्याकरिता इचलकरंजी नागरिक मंचच्या सर्व सदस्यांनी परिश्रम घेतले.

मोहन शिंदे ,
कोल्हापूर जिल्हाप्रतिनिधी .

Previous article*जिल्हा परिषदेच्या मतिमंद शाळांमधील विद्यार्थ्यांची पंखाविना भरारी*
Next articleठाकरे सरकार शेतकऱ्यांची दिवाळी गोड करणार, सोमवारपासून जमा होणार खात्यात पैसे
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here