Home Breaking News प्रश्नांची कमतरता नाही निर्णयाची कमतरता आहे ; राज ठाकरेंचा ठाकरे सरकारवर हल्लाबोल

प्रश्नांची कमतरता नाही निर्णयाची कमतरता आहे ; राज ठाकरेंचा ठाकरे सरकारवर हल्लाबोल

145
0

कुंथत कुंथत सरकार चालत
नाही ”
प्रश्नांची कमतरता नाही निर्णयाची कमतरता आहे ; राज ठाकरेंचा ठाकरे सरकारवर हल्लाबोल

विशेष प्रतनिधी – राजेश एन भांगे

मुंबई,दि. २९ – महाराष्ट्र राज्या तील वीज ग्राहकांना वाढीव वीज बिलांचा जो शॉक सरकारने दिला आहे त्या विरोधात जनक्षोभ उसळून देखील सरकार पाऊलं उचलत नाहीये. तसंच शेतकऱ्यांना मिळणारा दुधाचा भाव हा न्याय्य असायला हवा ह्या मागणी कडे पण सरकारने तात्काळ लक्ष द्यायला हवं होतं पण ते होताना दिसत नाहीये. म्हणूनच राज्यपाल भगतसिंग कुशारी यांनी ह्या दोनी विषयांत लक्ष घालण्याचे सरकारला निर्देश द्यावेत अशी विनंती मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी महोदयांना केली आहे.

कुंथत कुंथत सरकार चालवता येत नाही, राज ठाकरेंचा ठाकरे सरकारवर हल्लाबोल

राज्यात प्रश्न खूप आहेत. प्रश्नांची कमतरता नाही. कमतरता आहे ती फक्त निर्णया घेण्याची असं सांगतानाच निर्णय का घेतले जात नाहीत? कशासाठी हे सरकार कुंथत आहे? कुंथत कुंथत सरकार चालवता येत नाही, अशा शब्दात मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी राज्यातील ठाकरे सरकार वर टीका केली.

Previous article🛑 *कोट्यवधी खर्च करूनही बीआरटीचे घोडे अडलेलेच!* 🛑
Next articleउस्मानाबाद_ अल्पवयीन मुलीवर आत्याचार केल्या प्रकरणी एकाला १० वर्ष सक्तमजुरीची शिक्षा.
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here