Home Breaking News मुखेड तालुक्यातील शेतकरी परतीच्या पावसाने पुन्हा संकटात !

मुखेड तालुक्यातील शेतकरी परतीच्या पावसाने पुन्हा संकटात !

89
0

मुखेड तालुक्यातील शेतकरी परतीच्या पावसाने पुन्हा संकटात !
(मनोज बिरादार प्रतिनिधी युवा मराठा न्युज नेटवर्क)
जाहुर:परतीच्या पावसाने शेत पिकाच्या नुकसानीत भर घातली आहे.दर वर्षी आंक्टोबर महिन्याच्या अगोदर परतणाऱ्या पावसाचा या वर्षी मुक्काम लांबल्याने शेतातील वेचणीस आलेला कापूस व काढणीस आलेल्या सोयाबीनचे अतोनात नुकसान होत असल्याने शेतकरी संकटात सापडला आहे. गेल्या काही दिवसांपासून परतीच्या पावसाने परीसरात जोर धरला आहे. तालुक्यात ठिकठिकाणी पावसाने हजेरी लावली. शेतात कापूस फूटला आहे.काही शेतकरी कापूस वेचणीस सूरुवात केली आहे. सततच पाऊस पडत असल्याने अनेक शेतकऱ्यांचा शेतातील कापूस मातीमोल झाला आहे. उर्वरित असलेले बोंडे काळी पडून नासत आहेत.याची प्रचिती जाहूरसह उंद्री (प.दे) राजुरा भाटापुर चोंडी बिल्लाळी आदी परीसरात पहावयास मिळत आहे.

मजूराअभावी शेतातील कामे खोळंबली
*मजुराअभावी अनेक शेतातील कामे खोळंबली आहेत परतीच्या पावसाचा प्रवास लांबल्याने सगळीकडे पिक काढणीच्या कामास वेग आला आहे.सोयाबिन कापणी आणि मळणी सुरू आहे.तसेच कापूस वेचणी सुरुवात आहे.मजुरांची कमतरता जाणवत असल्याने काही शेतातील कापूस वेचणीची कामे खोळंबली आहेत.या वर्षीच्या हंगामात शेतकऱ्यांना चांगला फटका बसणार आहे.

सततच्या पावसाने कापसाचे अतोनात नुकसान झाले आहे.बोंडे सडायला लागल्याने व कापूस भिजल्याने शेतीचे अतोनात नुकसान झाले आहे.शासनाने आथिर्क मदत द्यावी केवळ आश्र्वासने देवू नये
– हानमंत कोत्तावाड शेतकरी उंद्री (प.दे)

Previous article*”गाढव मोर्चाच्या धास्तीने SBI बँक नरमली”*
Next article*डॉ. बाबासाहेब आंबेडकर रुग्णालयाची वेळ व व्याप्ती वाढवावी*
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here