*सटाणा तालुक्यात परतीच्या पावसाने शेतकऱ्याचे नुकसान*
सटाणा,(जगदिश बधान तालुका ग्रामीण प्रतिनिधी युवा मराठा न्युज नेटवर्क)-काल रात्री सटाणा तालुक्यात झालेल्या परतीच्या पावसाने शेतकऱ्याचे अतोनात नुकसान झाले असून,त्यामुळे निसर्ग राजाच्या या अवकृपमुळे शेतकरी वर्ग पुर्णपणे कोलमडून पडला आहे.
सटाणा तालुक्याच्या ग्रामीण भागात या अवकाळी पावसाचा सर्वाधिक फटका बसला असून,शेतकऱ्यांच्या मका पिकांबरोबरच डाळींब वगैरे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.तर अजमीर सौंदाणे येथे महादू रामसिंग पवार या शेतकऱ्यांची विहीर कोसळल्याने मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे.शासनाने तात्काळ पंचनामा करण्यासोबतच झालेल्या नुकसानीची भरपाई देण्याची मागणी केली जात आहे.