Home Breaking News *भगर खाल्याने ७/८ महिलाना विषबाधा,३ महिला आय सी यु मध्ये दाखल, राहुरी...

*भगर खाल्याने ७/८ महिलाना विषबाधा,३ महिला आय सी यु मध्ये दाखल, राहुरी फॅक्टरी येथील दुकानदाराचा महाप्रताप!*

107
0

*भगर खाल्याने ७/८ महिलाना विषबाधा,३ महिला आय सी यु मध्ये दाखल, राहुरी फॅक्टरी येथील दुकानदाराचा महाप्रताप!* अहमदनगर (प्रतिनिधी,-प्रा,ज्ञानेश्वर बनसोडे युवा मराठा न्युज नेटवर्क)- सध्या नुकतीच मोठया प्रमाणात नवरात्रोत्सवाला सुरुवात झाली आहे, महिला माता भगिनी मोठया आनंदाने व मनोभावे देवीचा उपवास धरून आपल्या मनोकामना पूर्ण करतात,या वेळी भगर,साबुदाणा ,खजूर व आदी उपवासाचे साहित्य दुकानातून खरेदी करतात, मात्र,दुकानदाराला या नवरात्रोत्सवसचे काहीही घेणे देणे नसल्याने खराब असलेला माळ बिनबोभाट माथी मारतात,,अशीच एक घटना अहमदनगर जिल्ह्यातल्या राहुरी तालुक्यातील राहुरी फॅक्टरी येथे घडली, मुसळवादी, गंगापूर, खळी, येथील किरकोळ विक्रेत्यानी राहुरी फॅक्टरी येथील एका नामांकीत दुकानातून या उपवासाच्या पदार्थाची खरेदी केली, त्या किरकोळ विक्रेत्यांकडून या माता भगिनींनी खरेदी केली,व ते उपवासाची भगर सेवन करताच त्यांना मध्यरात्री त्रास सुरू झाला त्वरीत या महिलांना प्रवरा हॉस्पिटल येथे उपचाराकरिता दाखल केले,तपासणी अंती भगर सेवन केल्याने विषबाधा झाली आहे, असे निदान वर्तविण्यात आले आहे,यातील ३ महिला आई सी यु मध्ये दाखल असून बाकी महिला व १ पुरुष यांचेवर जनरल वॉर्ड मध्ये उपचार सुरू आहेत,डॉक्टरांनी शर्थीचे प्रयत्न करून आपली जबाबदारी पार पडत आहेत, दुकानदार जरी लबाड निघाला,स्वार्थपोटी माता भगिनींच्या जिव्वा वर उठला असला तरी ,या पवित्र नवरात्रोत्सवात मात्र या माता भगिनीच्या रक्षणासाठी धावून आली आहे, असे म्हटल्यास वावगे ठरू नये, थोडक्यात,'”देव तारी त्यास कोण मारी ‘याची प्रचिती येथे आल्याशिवाय राहत नाही, दुकानदार बाबांच्या बाबतीत मात्र, “संसार केला कोट्यन कोटी ,मेल्यावर मात्र संग येईना लंगोटी”असे म्हटल्यास अति योग्य राहील ,असेही या ठिकाणी म्हणावेसे वाटते व ते सार्थ राहील, नागरिकांच्या मते सदर ची बाब ही अतिशय गंभीर असून संबंधित अन्न व औषध प्रशासन खात्याने या प्रकारची कसून चोकशी करून संबधीत दुकानदार यांचेवर कायदेशीर कारवाई करावी अशी मागणी करण्यात येत आहे

Previous articleकांदा दराची झेप ! उन्हाळ कांदा सात हजारावर ; तर लाल कांदा चार हजार रुपये प्रतिक्विंटल
Next article*सटाणा तालुक्यात परतीच्या पावसाने शेतकऱ्याचे नुकसान*
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here