*मराठा समाजाची समाज जागृती तिसरी मोहीम वाठार गावांत*
*कोल्हापूर (मोहन शिंदे ब्युरोचिफ युवा मराठा न्युज)*
मराठा समाजाची समाज जागृतीची तिसरी मोहीम वाठार येथे हनुमान मंदिरात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करणेसाठी एका छोट्या मावळ्याकडून पुष्पहार अर्पण करून मोहिमेला सुरुवात केली. यावेळी डॉ. अजय मस्के वाठार यांनी छत्रपती शिवाजी महाराजांना वंदन करून मोहिमेस सुरुवात केली.
सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षणाला स्थगिती दिल्याने राज्यभर आरक्षणा विरोधात संपूर्ण मराठा समाज पुन्हा आंदोलन करण्यासाठी मराठा समाज गावागांवात एकत्र येत आहे.
तसेच हातकणंगले तालुक्यातील पेठ वडगांव व परिसरातील ३१ गावांमध्ये मराठा समाज जागृती मोहीम राबवन्याचे काम मराठा समाज मोठ्या प्रमाणात करत आहे.
सद्याच्या सरकारला मराठा समाजाला न्याय देण्याकरिता वेळ नाही. परंतु अभिनेत्री कंगना राणावत या बाईला वाय प्लस सुरक्षा केंद्र सरकार देत आहे , सुषांतच्या बातम्या द्यायला मिडीयाला वेळ आहे , पण कधी शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन शेतकरी का आत्महत्या करतोय हे दाखवायला वेळ आहे.
पण ह्या झोपलेल्या सरकारला मराठा समाजाला आरक्षण बाबत काहीच गांभीर्य नाही किंवा कोणताही निर्णय घेतलेला नाही. कोल्हापूरचे छत्रपती संभाजीराजे यांनी देशाचे पंतप्रधान यांना तीन तिन वेळा पत्र पाठवून सुद्धा एकाही पत्राचे उत्तर देता आलं नाही मराठा समाजासाठी केंद्र सरकार राज्य सरकार जाणून-बुजून चालढकल करत आहे .
संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मराठा समाजाने आरक्षणासाठी 58 मोर्चे काढून सुद्धा मराठा समाजाच्या पदरात निराशाच आली आहे, त्यामुळे इथून पुढील पिडीसाठी आपल्याला आताच आरक्षणा विरोधात मोठया प्रमाणात लढा देणे गरजेच आहे.
आण्णासाहेब पाटील महामंडळ हे तात्पुरती मलम पट्टी आहे, याचा लाभ शंभरात एकालाच मिळतोय,
सरकारचे धोरण मराठा समाजाचा तोंडाशी आलेला घास हिरावून घेणे. सद्याचे सरकार पुर्ण पणे झोपले असुन झोपेतून जागं करण्यासाठी मराठा समाज मोठ्या प्रमाणात एकत्र येत आहे.
यावेळी वाठार गावामध्ये मराठा समाजातील युवक मोठ्या संखेने उपस्थित होते.
यावेळी पेठ वडगांवचे डॉक्टर अभयसिंह यादव यांनी आपल्या मराठा समाजावर झालेल्या अन्यायाविरोधात आपण सर्वांनी भगव्या झेंड्याखाली एकत्र येऊन मराठा आरक्षण मिळविण्यासाठी मोठा लढा देण्याची गरज आहे.
साडे तिनशे वर्षापूर्वी ज्या प्रमाणे छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना केली त्याच प्रमाणे आपला मराठा समाज एकत्रितपणे येऊन आरक्षणाविरोधात लढा देण्याची गरज आहे. यावेळी मराठा समाजाचे अभ्यासक पुंडलिक बिरंजे आळते , हनुमंत पाटील सावर्डे ,विजयसिंह शिंदे वडगांव , प्रल्हाद पाटील घुणकी ,
प्रविण खोपकर किणी , मच्छिंद्र पाटील पारगांव , गोरख शिंदे वाठार , सयाजी पाटील चावरे , शिवाजी माने , सुहास जाधव ,प्रभाकर कुरणे , बाळासाहेब पाटील पारगांव , संताजी माने किणी , विवेक पाटील भादोले , डाँ.अजय मस्के वाठार ,
अँड.अक्षय भोसले वडगांव ,
रामकृष्ण लोकरे ( बापू )अंबप, डाँ.अभयसिंह यादव वडगांव , संताजी माने , यांनी वेगवेगळ्या पद्धतीने मार्गदर्शन करून कशा पद्धतीने आपल्याला आरक्षण मिळवावे लागेल ,पुढील दिशा ठरवून उत्कृष्टरित्या युवकाना समाजप्रभोदन केले.
संकेत मस्के वाठार , मदन पाटील वडगांव व वाठार मधिल मराठा समाज मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.
याप्रसंगी मराठा समाजातील युवक वाठार गावांतील मराठा समाज मोठ्या प्रमाणात उपस्थित होता.