Home Breaking News *अहमदनगर जिल्ह्यात मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत*

*अहमदनगर जिल्ह्यात मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत*

112
0

*अहमदनगर जिल्ह्यात मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत* राहुरी,(प्रा,ज्ञानेश्वर बनसोडे प्रतिनिधी युवा मराठा न्युज नेटवर्क) – राहुरी तालुक्यात व परिसरात काल रात्री व आज सायंकाळी मुसळधार पाऊस झाला आहे, सतत दोन दिवस चालना ऱ्या या संतत धार पावसामुळे हवेत मोठया प्रमाणात गारवा निर्माण होऊन आजारी पडणाऱ्यांच्या संख्येत मोठया प्रमाणात वाढ होत आहे,परंतु सध्या कोरोना आजाराचे वाढते प्रमाण लक्ष्यात घेता, नागरिक दवाखान्यात जाण्यास टाळाटाळ करत असल्याचे चित्र दिसून येत आहे, कारण ,पावसाळी हवामानामुळे आपण आजारी पडतोय ,परंतु डॉक्टरांना कोरोनाचा संशय येऊन आपणास उपचाराकरिता covid सेंटर ला पाठवतील या भीतीपोटी लोक दवाखान्यात जाण्याचे टाळत आहेत,काल पासून या संतत धार पावसाने राहुरी तालुक्यातील देवळाली प्रवरा, गुहा,कनगर, वांबोरी, सोनगाव , मांजरी पाने गाव ,डिग्रस, गुंजळे, कात्रड, मानोरी,धामोरी, सडे, उंबरे, व तालुक्यातच नव्हे तर संपूर्ण अहमदनगर जिल्याला पावसाने घेरले आहे, अति पावसामुळे मुळा धरण पातळी ओलांडू पाहत असून मुळा धरण व परिससतील नागरिकांनी सतर्क राहावे असा धोक्याचा इशारा देण्यात आला आहे,या संतत धार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे, काय म्हणावे या निसर्गाला असे उदगार प्रत्येकाच्या तोंडून बाहेर पडत आहेत, या अति वृष्टीमुळे प्रत्येक गावात व परिसरात घाणीचे साम्राज्य निर्माण होऊन आरोग्य धोक्यात येऊ पाहत आहे, त्या मुळे प्रत्येक नागरिकाने आपल्या आरोग्याची काळजी घ्यावी अशी चरच्या परिसरात सुरू आहे

Previous articleमुखेड तालुक्यातील अतिवृष्टीग्रस्त भागाची, जिल्हाधिकारी डॉ. विपीन यांनी पाहणी केली
Next article*कथा एस.टी.ची* *व्यथा कर्मचाऱ्यांची*
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here