*कथा एस.टी.ची*
*व्यथा कर्मचाऱ्यांची*
*कोल्हापूर (मोहन शिंदे ब्युरोचिफ युवा मराठा न्युज)*
एस.टी.महामंडाळातील कर्मचाऱ्यांची व्यथा ….
करार पण गेला आयोग पण गेला साधा पगार पण होईना वेळेवर
तुम्हीच सांगा मायबाप सरकार भरोसा ठेवायचा आम्ही कोणावर ?
थकले सारे वीज बिल खोली भाडे पैसा नाही खिशाला
पगार नाही म्हणते बायको मग कामावर जाता कशाला ?
आज होईल उद्या होईल पगार बायकोशी पण किती खोटं बोलायचं
तुम्हीच सांगा मायबाप सरकार नुसत्या भातावर आम्ही किती दिवस जगायचं ?
कधी आम्ही आजारी कायमचे आम्ही कर्जबाजारी खायचे पण झालेत वांदे ,
पैसा नाही जवळ बायको रोज आपटती भांडे .
संपलीये आता सहनशीलता गुदमरतोय आमचा श्वास
जेवतानाही मोजावा लागतो इथे अन्नाचा प्रत्येक घास.
जिवंतपणीच पगार मिळेना इथे वेळेवर,
सरकार म्हणतंय 50 लाख
देतोय तुला मेल्यावर ?
नको तुमचे 50 लाख फक्त दिला शब्द खरा ठरवा.
राज्य शासनात विलीन करून
एस.टी. मात्र आमची जगवा
एस.टी.मात्र आमची जगवा ..
संपूर्ण महाराष्ट्रातील एस.टी.कामगारांची एकच मागणी ..
कोरोनाच्या महामारी संकटाने एस.टी.महांमडळ आर्थिक नुकसानीच्या संकटात सापडली आहे.
महाराष्ट्राच्या लाडक्या लोकवाहीणीला
राज्य शासनाने एस.टी.ला राज्यशासनात विलीनीकरन करून एस.टी.कर्मचाऱ्यांच्या कुठूंबाला आधार देण्याची काळाची गरज आहे.