*तिसगांव प्रवेश द्वार ते तिसाई मंदीर रस्त्याचे काम वर्षभर रखडले !*
*कोल्हापूर (मोहन शिंदे ब्युरोचिफ युवा मराठा न्युज)*
गेल्या विधान सभा निवडणूकीची आचार संहीता लागण्या पूर्वीच २४ तास अगोदर भूमिपूजन झालेल्या तिसगांव प्रवेश द्वार ते तिसाई मंदीर या रस्त्याच्या काँक्रीटीकरणाचे काम गेल्या वर्षभर रखडले असल्याने या परिसरातील नागरीकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहेत .
एम.एम. आर . डी . ए . अंतर्गत या रस्त्याच्या कामासाठी कल्याण पूर्व विधानसभा मतदार संघाचे आमदार यांनी युती शासनाच्या माध्यमातून ३ कोटी ८० लाखांचा निधी मंजूर करून आणला होता . या रस्त्याचे रुंदीकरण आणि कॉक्रीटीकरण कामाचे भूमिपूजन १६ सप्टेबर २०१९ रोजी झाले होते . त्या नंतर विधान सभेची आचार संहीता लागली आणि निवडणूकी नंतर सत्तेत आलेल्या आघाडी सरकारने युती शासनाच्या कार्यकाळातील सर्व विकास कामांना स्थगिती दिली . या कारणांमुळे हे काम चालु होऊनही पुन्हा बंद पडले होते . परंतु बंद पडलेले काम पुन्हा सुरु झालेही परंतु गेल्या दिड ते दोन महिन्यां पासुन हे काम पुन्हा बंद पडले असल्याने या रस्त्याच्या दोन्ही बाजुच्या पदपथाचे काम अपूर्णावस्थेत असल्याने नागरीकांना या अपुर्णावस्थेतील पदपथांवरून मोठी कसरत करून आपले घरातून बाहेर पडावे लागत आहे .
या रस्त्याचे सुमारे ७० टक्क्याहून, अधिक प्रमाणात कॉक्रीटीकरण झालेही आहे . परंतु रस्त्याच्या दोन्ही कडेला पदपथ आणि गटारांची कामे गेली दिड ते दोन महिने झाले अपूर्ण ठेवण्यात आल्याने या ठिकाणच्या इमारतीतील प्रवेशद्वारातून रहीवाश्यांना आपली वाहने आत – बाहेर नेता येत नसल्याने रहिवाश्यांत संताप व्यक्त केला जात आहे .
या रस्त्याचे काम कधी पूर्ण होईल कींवा सदरचे काम का बंद करण्यात आले आहे याची कोणत्याच प्रकारची माहीती पालिका स्तरावरून उपलब्द होत नसल्याने ज्या ठिकाणी शक्य होईल त्या ठिकाणी कीमान रहिवाश्यांना इमारतींमधून बाहेर पडण्यासाठीचा मार्ग तरी बनवून देण्यात यावा अश्या प्रकारची मागणी स्थानिक नागरीक करू लागले आहेत .
या रस्त्याच्या कामासाठी ठिकठिकाणी खोदकाम करून ठेवले असल्याने बहुतांशी खड्यांमध्ये घाणीचे साम्राज्य पसरले असून या मुळे परिसरातील नागरीकांचे आरोग्य धोक्यात येण्याची शक्यताही वर्तविली जात आहे .