Home Breaking News *श्री गणपती लिहिलेले दुर्मिळ नाणं*

*श्री गणपती लिहिलेले दुर्मिळ नाणं*

225
0

*श्री गणपती लिहिलेले दुर्मिळ नाणं*

*कोल्हापूर (मोहन शिंदे ब्युरोचिफ युवा मराठा न्युज)*

मराठा साम्राज्यातील एक दुर्मिळ आणि महत्त्वाचं नाणं चंद्रपुरातील इतिहास अभ्यासक अशोकसिंग ठाकूर यांच्याकडे विद्यमान आहे.
या नाण्यावर एकाबाजूला ‘श्री गणपती’ तर दुसऱ्या बाजूला ‘पंतप्रधान’ असं लिहिलं आहे.
1759 ते 1896 या काळात होऊन गेलेला मोगल शासक बादशाह शाह आलम द्वितीय यांच्या कार्यकाळातील हे नाणं आहे. सम्राट मोगल असला तरी नाण्यावर श्री गणपती आणि पंतप्रधान असं का लिहिण्यात आलं, याचाही इतिहास आहे. हे नाणं महाराष्ट्रातील मूर्तजाबाद म्हणजे आताचं मिरज इथं तयार करण्यात आलं. मिरजचे तत्कालीन संस्थानिक पटवर्धन यांनी याची निर्मिती केली असून, पंतप्रधान म्हणजे पेशव्यांप्रति आपली निष्ठा व्यक्त करण्यासाठी त्यांनी आराध्य दैवत श्री गणपती आणि पंतप्रधान असं नाण्यावर अंकित केलं. याबरोबरच दिल्लीचा मोगल सम्राट शाह आलम बादशाह गाजी यांचं नाव आणि हिजरी वर्षही नाण्यावर नमूद आहे. त्याकाळी संस्थानिक कुणीही असला तरी दिल्लीत ज्याचं शासन आहे, त्याच्या नावानंच नाणं प्रसिद्ध करण्याचा नियम होता. त्यानुसार या नाण्यावर श्री गणपती आणि पंतप्रधान या शब्दांसह साम्राटाचा पण उल्लेख केला गेला. हे नाणं चांदीचं असून, 11.34 ग्रॅम एवढ्या वाजनाचं आहे. सध्या हे नाणं फार दुर्मिळ असून, मराठा साम्राज्याचा इतिहास सांगणारं आहे. इतिहास अभ्यासक अशोकसिंग ठाकूर यांनी हे नाणं मोठी किंमत मोजून अधिकृत लिलावातून खरेदी केलं. अशा वेगवेगळ्या कालखंडातील अनेक नाण्यांचा संग्रह त्यांच्याकडे आहे. आज गणेशाची स्थापना आहे. या पार्श्वभूमीवर श्री गणपती लिहिलेलं नाणं त्यांनी समोर आणलं.शा

Previous article🛑 *मध्यवर्ती पेठांमध्ये एकाच रात्रीत 5 दुकाने फोडले** 🛑
Next article*आता बँकाचेंही होणार खासगीकरन* *मोदी सरकारचा* *निर्णय*
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here