![](https://yuvamarathanews.com/wp-content/uploads/2024/04/IMG-20240428-WA0052.jpg)
![](https://yuvamarathanews.com/wp-content/uploads/2023/10/IMG-20240114-WA0024.jpg)
🛑 मुंबईत दोन दिवस मुसळ’धार’; घरातच थांबा; पोलिसांच्या सूचना 🛑
मुंबई ( साईप्रजित मोरे ब्युरो चीफ युवा मराठा न्युज )
मुंबई, 03 जुलै : ⭕ उद्या शुक्रवारी आणि शनिवारी मुंबईत जोरदार ते अति जोरदार पाऊस पडणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. त्यामुळे हे दोन दिवस कारण नसताना घराबाहेर पडू नये, असं आवाहन मुंबई पोलिसांनी केलं आहे. दरम्यान, मुंबईसह राज्यातील काही भागात अति जोरदार पाऊस पडण्याची शक्यता असून हवामान खात्याने ऑरेंज अॅलर्ट जारी केला आहे.
मुंबई पोलिसांनी आज एक ट्विट करून हे आवाहन केलं आहे. हवामान खात्याने मुंबईत शुक्रवार आणि शनिवारी दोन दिवस जोरदार ते अतिजोरदार पाऊस पडण्याचा अंदाज वर्तवला आहे. त्यामुळे नागरिकांनी दोन दिवस घरातच थांबावे. कारण नसताना घराबाहेर पडू नये आणि आवश्यक ती काळजी घ्यावी, असं आवाहन मुंबई पोलिसांनी ट्विटमध्ये केलं आहे.
येत्या २४ तासांत मुंबईसह ठाणे, पालघर नाशिक, नंदूरबार, धुळे आणि जळगावमध्ये विजेच्या कडकडाटांसह जोरदार पाऊस पडण्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. तर रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्गमध्ये अतिजोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्याशिवाय मध्य महाराष्ट्रात मेघगर्जनेसह अति जोरदार पाऊस होण्याची शक्यताही वर्तवण्यात आली आहे. तसेच उद्या पुण्यातील काही भागातही अति जोरदार पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तर शनिवारी मुंबईसह पुणे, नाशिक, अहमदनगर आणि धुळ्यातही जोरदार पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. शनिवार आणि रविवारी पावसाचा जोर अधिक वाढण्याचा अंदाज आहे. ठाणे, पालघर, मुंबई, रत्नागिरी आणि सिंधुदुर्गात जोरदार पाऊस होणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. तसेच ऑरेंज अॅलर्टही जारी करण्यात आल्याचं हवामान विभागाने स्पष्ट केलं आहे. दरम्यान, आज मुंबई-ठाण्यातील काही भागात पावसाने हजेरी लावली. मुंबई, ठाणे आणि पनवेलमध्ये ढगांच्या प्रचंड गडगडाटासह जोरदार पाऊस कोसळला. ढगांचा प्रचंड आवाज झाल्याने अनेक लोक घराबाहेर पडले. जुलैमध्ये संपूर्ण कोकणासह मुंबईत जोरदार पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे.⭕