Home Breaking News रुग्णवाढ रोखण्यासाठी ,औरंगाबाद मधे ” केरळ ” पॅटर्न ✍️ ( विजय...

रुग्णवाढ रोखण्यासाठी ,औरंगाबाद मधे ” केरळ ” पॅटर्न ✍️ ( विजय पवार महाराष्ट्र प्रतिनिधी युवा मराठा न्युज )

345
0

🛑 रुग्णवाढ रोखण्यासाठी ,औरंगाबाद मधे ” केरळ ” पॅटर्न 🛑
✍️ ( विजय पवार महाराष्ट्र प्रतिनिधी युवा मराठा न्युज )


औरंगाबाद :⭕गेल्या काही दिवसांपासून औरंगाबाद शहरात करोना संसर्ग झालेल्या रुग्णांची वाढत होत आहे. त्याला आळा घालण्यासाठी औरंगाबाद शहरात ‘केरळ पॅटर्न’ राबवला जाणार आहे, अशी माहिती महापालिकेचे प्रशासक आस्तिककुमार पांडेय यांनी दिली. ‘केरळ पॅटर’नची अंमलबजावणी तातडीने अंमलबजावमी सुरू केली जात आहे, असे त्यांनी सांगितले.

औरंगाबाद:/  गेल्या काही दिवसांपासून औरंगाबाद शहरात करोना संसर्ग झालेल्या रुग्णांची वाढत होत आहे. त्याला आळा घालण्यासाठी औरंगाबाद शहरात ‘केरळ पॅटर्न’ राबवला जाणार आहे, अशी माहिती महापालिकेचे प्रशासक आस्तिककुमार पांडेय यांनी दिली. ‘केरळ पॅटर’नची अंमलबजावणी तातडीने अंमलबजावमी सुरू केली जात आहे, असे त्यांनी सांगितले.
लॉकडाऊन’ शिथिल केल्यानंतर प्रामुख्याने आठ जूनपासून औरंगाबाद शहरात करोना रुग्णांची संख्या वाढू लागली आहे. दररोज ९० ते १२० यादरम्यान नवे रुग्ण आढळत आहेत. याबद्दल पत्रकारांनी प्रशासक पांडेय यांना विचारले असता ते म्हणाले, ‘लॉकडाऊननंतर रुग्ण संख्या वाढू न देण्याची जबाबदारी नागरिकांची आहे. त्यांनी सुरक्षित वावरणे, मास्क वापरणे व सॅनिटायझरचा वापर करणे, वारंवार हात धुणे हे नियम पाळले तर रुग्णांची संख्या वाढणार नाही. काही खासगी संस्थांच्या माध्यमातून विविध शहरातील संभाव्य रुग्ण संख्येबद्दल सर्वेक्षण करून अंदाज वर्तविण्यात आला होता. त्यानुसार औरंगाबाद शहरात नऊ जूनपर्यंत २१ हजार रुग्ण होतील, असा अंदाज होता, परंतु सध्या औरंगाबादमध्ये रुग्णांची संख्या तीन हजारांच्या घरात आहे. रुग्ण संख्या वाढू न देण्यात महापालिकेच्या यंत्रणेला यश आले आहे.’
महापालिकेने २० मेपर्यंत ‘इन्स्टिट्युशनल क्वारंटाइन’चे प्रमाण वाढवले होते. त्यामुळे रुग्ण संख्या नियंत्रणात ठेवणे शक्य झाले. करोनाबाधित एखादा व्यक्ती आढळून आल्यावर त्याच्या घरातील सर्वांना व त्याच्या निकट संपर्कातील (क्लोज कॉन्टक्ट) व्यक्तींना शोधून त्यांना ‘क्वारंटाइन’ केले जात होते. दुसऱ्या दिवशी त्या सर्वांचे लाळेचे नुमने घेतले जात होते. नमुन्यांचे अहवाल पॉझिटिव्ह आल्यानंतर त्यांना उपचारासाठी हॉस्पिटलमध्ये दाखल केले जात होते. उर्वरितांना काही दिवस ‘क्वारंटाइन सेंटर’मध्येच ठेवले जायचे. आता पुन्हा तीच पद्धत अवलंबली जाणार आहे, असे प्रशासक पांडेय यांनी स्पष्ट केले. केरळमध्ये ही पद्धत प्रभावीपणे राबवली गेली. ‘ट्रेस, आयसोलेट, टेस्ट, ट्रीट’ या चतुःसूत्रीवर ही पद्धत आधारित आहे. मुंबईत ‘ट्रेस, टेस्ट, आयसोलेट’ ही पद्धत अवलंबली जात आहे, असे त्यांनी सांगितले. ‘क्वारंटाइन’चे प्रमाण वाढवून रुग्णसंख्येल आळा घातला जाईल, असे पांडेय यांनी स्पष्ट केले….⭕

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here