Home Breaking News आजपासून घरगुती गॅस सिलेंडर महागले

आजपासून घरगुती गॅस सिलेंडर महागले

116
0

🛑आजपासून घरगुती गॅस सिलेंडर महागले 🛑
मुंबई 🙁 साईप्रजित मोरे ब्युरो चीफ युवा मराठा न्युज )

मुंबई ⭕ एलपीजी सिलेंडरची किंमत सोमवारपासून वाढली आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर एलपीजीच्या किंमती वाढल्यामुळे भारतात एलपीजीच्या किंमती वाढविण्यात आल्या आहेत. राजधानी दिल्लीत विनाअनुदानित १४.२ किलो सिलेंडर ११.५० रुपयांनी महागला आहे. इंडियन ऑईलच्या वेबसाइटनुसार, आधी दिल्लीत याची किंमत ५८१.५० रुपये होती, जी आता प्रति सिलेंडर ५९३ रुपये झाली आहे. त्याचप्रमाणे कोलकातामध्येही आता याची किंमत ५८४.५० वरुन ६१६ रुपये झाली आहे. कोलकातामध्ये १४.२ किलो विनाअनुदानित एलपीजी सिलेंडरचे दर ३१.५ रुपयांनी वाढले आहेत. दरातील ही वाढ 1 जूनपासून लागू झाली आहे.

मुंबईत विनाअनुदानित गॅस सिलेंडरच्या किंमतीत ११.५० रुपयांनी वाढ झाली आहे. सिलेंडरची किमत ५७९ वरुन आता ५९०.५० रुपये झाली आहे. चेन्नईत विनाअनुदानित गॅस सिलेंडरच्या किंमतीत ३७ रुपयांनी वाढ झाली आहे. सिलेंडरची किमत ५६०.५० वरुन ६०६.५० रुपये झाली आहे.

पंतप्रधान उज्ज्वला योजनेच्या लाभार्थींना कोणताही त्रास होणार नाही

पंतप्रधान उज्ज्वला योजनेच्या लाभार्थ्यांवर एलपीजी सिलिंडरच्या किंमती वाढीचा कोणताही परिणाम होणार नाही. पीएमयूवायच्या लाभार्थ्यांना ३० जूनपर्यंत एक विनामूल्य सिलेंडर मिळेल. अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनेंतर्गत उज्ज्वला योजनेतील लाभार्थ्यांना तीन महिन्यांसाठी मोफत एलपीजी सिलेंडर देण्याची घोषणा केली होती.

१९ किलो गॅस सिलिंडरही महागला

याशिवाय १ जूनपासून १९ किलो एलपीजी गॅस सिलेंडरच्या किंमतीही वाढल्या आहेत. दिल्लीत १९ किलो गॅस सिलिंडरच्या किमती ११० रुपयांनी वाढविण्यात आल्या असून गॅस सिलेंडर ११३९.५० रुपये झाला आहे. त्याचप्रमाणे कोलकातामध्येही या गॅस सिलिंडरची किंमत १०७.५० रुपयांनी वाढून ११९३.५० रुपये झाली आहे. मुंबईत या सिलिंडरची किंमत १०९.५० रुपयांनी वाढून १०८७.५० रुपये झाली आहे.⭕

Previous articleपरप्रांतातून आलेल्या तीन हजार नागरिकांना सर्दी खोकला
Next articleमुंबईतील करोनाचा पहिला हॉटस्पॉट वरळी कोळीवाडा करोनामुक्तीकडे
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here