आशाताई बच्छाव
युवा मराठा विशेष रात्रीचा गोंधळ बराच होता!ग्रामसेवकांची हमरीतुमरी(सांगण नही पन सांगण वन) वाचकहो,ऐकावे ते नवलच…ज्यांच्या हाती गाव विकासाची दोरी,ते गावाचे कल्याण करी…अशी ज्यांची ओळख असते अर्थातच ग्रामसेवक! पण…अगदी अलिकडेच नाशिक सारख्या पुण्यभुमीत ग्रामसेवकाच्या संघटनेतील पद निवडीवरुन अक्षरशः हमरीतुमरी झाल्याची चर्चा कर्णापकर्णी मोठया चवीने चर्चिली जात आहे.त्याचे झाले असे की,नाशिक येथे ग्रामसेवकाच्या संघटनेतील व पतसंस्थेवरील संचालक पदाविषयी महत्त्वाची बैठक “नाना”नी आयोजीत केलेली होती.मात्र मालेगांव तालुक्यातील ग्रामसेवकातच एकमत नसल्याने हे पद याचे गळ्यात टाकायचे की,त्याच्या गळ्यात घालायचे या रस्सीखेचीतच वादावादी सुरु झाली.अक्षरश शिव्यांची लाखोली वाहिली गेली.हमरीतुमरीवर आलेले हे प्रकरण अखेर कसे बसे शांत करण्यात आले.पण…”हि-यांच्या” गारगोटया झाल्याचे देखील यानिमिताने बघावयास मिळाले.तर तालुक्यातील ग्रामसेवकाचे नेतृत्व करणारे तालुकाध्यक्ष व नवनिर्वाचीत संचालक कुठे अपूरे पडले शेवटी हा प्रश्न उरतोच.मात्र यानिमिताने मालेगांव तालुक्याची चांगलीच नाचक्की ग्रामसेवकांनी नाशिक नगरीत करवून घेतली व स्वतःचे हसे करुन घेतले एव्हढे मात्र खरे! (राजेंद्र पाटील राऊत)