आशाताई बच्छाव
महावीर चौकात हिरव्या झेंड्याविरोधात जैन समाजाने प्रशासनाकडे निवेदन
जालना, दिलीप बोंडे ब्युरो चीफ : जालना शहरातील ऐतिहासिक आणि धार्मिक दृष्ट्या महत्त्वाच्या महावीर चौकात हिरवा झेंडा लावण्यात आल्याने जैन समाजामध्ये तीव्र संताप व्यक्त झाला आहे. महावीर चौक हा जैन समाजासाठी धार्मिक व ऐतिहासिक दृष्ट्या अत्यंत महत्त्वाचा ठिकाण असून, येथे भगवान महावीर स्वामी यांचे स्मृतीचिन्ह आहे. या धार्मिक स्थळावर अशा प्रकारची अनधिकृत कृती झाल्यामुळे समाजाच्या धार्मिक भावना गंभीरपणे दुखावल्या गेल्या आहेत.
यासंदर्भात जैन समाजाच्या वतीने जालना महानगरपालिका आयुक्त, मा. पोलीस निरीक्षक, सदर बाजार पोलीस स्टेशन तसेच मा. पोलीस अधीक्षक जालना यांना स्वतंत्र निवेदने सादर करण्यात आली आहेत. निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, दि.7 सप्टेंबर रोजी महावीर चौक परिसरात हिरवा झेंडा लावलेला आढळून आला आणि हा प्रकार शहरातील शांतता, सुव्यवस्था व सामाजिक ऐक्य बिघडविण्याचा हेतुपुरस्सर प्रयत्न असल्याचे स्पष्ट दिसून येते.
सकल जैन समाज सेवा व सकल हिंदू समाजाच्या वतीने बोलताना अक्षय गोरंट्याल म्हणाले, “अलीकडेच आमच्या महावीर भगवान यांच्या स्मारक सेवापुतळा चौकात चुकीची घटना घडली. त्या ठिकाणी हिरवा झेंडा लावण्यात आला होता. तो आम्ही काढून टाकला असून, समाज व सकल हिंदू समाजाने गोमूत्राने पूर्ण परिसराची स्वच्छता करून पुन्हा आमचा झेंडा लावला आहे. यापूर्वीच आम्ही सदर बाजार पोलीस स्टेशनमध्ये तक्रार व अनेक निवेदनं दिली होती. आता या घटनेनंतर आम्ही महापालिकेतही निवेदन देणार आहोत. सीसीटीव्ही कॅमेऱ्यातून पुरावे मिळतील आणि त्यावर योग्य कारवाई व्हावी, अशी आमची अपेक्षा आहे. पोलिसांना आमची एकच विनंती आहे की अशा घटना सतत घडू नयेत. मागील 1 तारखेलाही अशीच घटना घडली होती. त्या वेळी तत्पर कारवाई केल्याबद्दल आम्ही प्रशासनाचे आभारी आहोत.






