आशाताई बच्छाव
पेनटाकळी प्रकल्पात वरील कॅनॉल फुटुन अनेक शेतकऱ्यांच्या जमिनी गेल्या खरडून….
युवा मराठा न्यूज बुलढाणा जिल्हा ब्युरो चीफ संजय पन्हाळकर
बुलडाणा:- मेहकर मेहकर तालुक्यातील पेन टाकळी प्रकल्प वरून जाणार्या कॅनॉल मुळे अनेक शेतकऱ्यांच्या जमिनी खरडुन गेल्या होत्या त्यामुळे सदर कॅनॉल चे काम होईपर्यंत पाणी सोडण्याबाबत शेतकऱ्यांनी विरोध केला होता. सदर कॅनॉल निधी उपलब्ध झाला असून दोन महिने पासून कामं सुरू आहे. माहन पासून काम सुरू आह.दि.26 जुन रोजी मोठ्या प्रमाणावर पाऊस झाला व अनेक ठिकाणी कॅनाल चे काम सुरू असल्याने पाण्याचा ओह कॅनॉल च्या बाहेर जाऊन तो फुटल्यामुळे मोठ्या प्रमाणावर शेतकऱ्यांचा जमिनी खरडुन पेरणी केलेल्या पिकांचे नुकसान विहीर चे इत्यादी नुकसान झाले आहे.सोनारगव्हाण शिवार मध्ये सावत्रा येथील शेतकरी असल्या जमीन श्रीराम निकस भागवत निकस, शिवाजी निकस, गंगाधर निकस, विलास निकस, विष्णू निकस, अमोल निकस, सतीश निकस, यश निकस, शालीग्राम निकस, मदन निकस, संतोष निकस, रुपराव निकस, यांनी पेनटाकळी प्रकल्पाच्या अधिकाऱ्यांच्या निष्काळजीपणामुळे ओव्हर फ्लो चे गेट बंद असल्यामुळे हा सर्व प्रकार घडला आहे असा आरोप केला आहे.






