आशाताई बच्छाव
औरंगाबाद येथे राज्यस्तरीय व तुमसर येथे झालेल्या जिल्हास्तरीय अबॅकस स्पर्धेत आमगाव येथील विद्यार्थ्यांनी मारली बाजी
संजीव भांबोरे
भंडारा- दिघोरी आमगाव परिसरात अनुकूल शैक्षणिक वातावरण निर्माण करण्यासाठी श्री ट्युशन क्लास आणि द वर्ल्ड अबॅकस चे संचालक मा.स्वप्नील गजभिये सर मागील पाच वर्षा पासू सतत अविरत कार्य करीत आहेत , क्लास च्या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये जिज्ञासु वृत्ती निर्माण करने , कलागुणांना वाव देने , सुप्त गुण ओळखून चालना देने ,शैक्षणिक उपक्रमात सहभाग वाढविणे , निरोगी आरोग्यासाठी योगा व ध्यान उपक्रम राबविने , स्पर्धा मध्ये टिकण्यासाठी सक्षम बनविने , व्यसनापासून दूर ठेवणे , विध्यार्थी व पालक यांच्यात मित्रत्वाचे नाते निर्माण करणे , तसेच त्यांच्या समस्या चे निराकरण करणे ,या सर्व बाबतीत श्री ट्युशन क्लास मागील अनेक वर्षे कार्य करीत आहे ,
द अबॅकस वर्ल्ड ने औरंगाबाद येथे राज्यस्तरीय आणि तुमसर येथे जिल्हास्तरीय स्पर्धेचे आयोजन केले होते , त्यात अनेक विद्यार्थ्यांनी सक्रीय सहभाग नोंदवला होता , त्यात राज्यस्तरावर प्रथम क्रमांक देवांश पराग बारई , राज्यस्तरीय चॅम्पियन रँक विजेता क्रमांक श्लोक सुधाकर जगनाडे यांनी पटकावले , आमगाव येथे सुद्धा चित्रकला स्पर्धा , हस्ताक्षर स्पर्धा , नृर्त्य स्पर्धा घेण्यात आले ,चित्रकला स्पर्धेत सोनिया भुरे ने प्रथम क्रमांक पटकावला ,लेवल वन मध्ये प्रथम क्रमांक अय्युब गोलांगे
द्वितीय क्रमांक वृषभ बेदरकर
तृतीय क्रमांक स्वरा शिंगाडे,बेस्ट विज्वलायझेशन प्राईज
धन्वी विजयकांत भालाधरे ,जिल्हास्तरीय अबॅकस स्पर्धेत विजय विद्यार्थी
श्लोक सुधाकर जगनाडे
यश योगेश सार्वे
अय्युब ग्यानिवांत गोळंगे, सहभागी सर्व विद्यार्थ्यांना ट्राफि आणि प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले , तर सर्वच सहभागी विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र देण्यात आले ,
कार्यक्रमाचे अध्यक्ष सन्माननीय सतीश पॉल प्रिन्सिपल सर सेंड पॉल इंग्लिश स्कूल भंडारा ,कार्यक्रमाचे उद्घाटक सन्माननीय नामदेवजी घोडमारे सर प्राचार्य अबॅकस वर्ल्ड क्लासेस लाखनी ,कार्यक्रमाचे मार्गदर्शक सन्माननीय देवानंद चौधरी सर
सत्य साई सेवा समिती अध्यक्ष ,प्रमुख पाहुणे अवी शिंगाडे सर पोलीस पाटील टेकेपार हे होते ,कार्यक्रमाचे आयोजक सन्माननीय स्वप्निल गजभिये सर श्री बहुद्देशीय संस्था हे होते ,बोलताना वक्ते म्हणाले की , ब्रेन जिम आणि ऍबकस सारख्या उपक्रमात सहभागी होऊन आपल्या सुप्त आणि बौद्धिक गुणांचा विकास करावा असे म्हणाले, संस्थेचे अध्यक्ष गजभिये सर म्हणाले की , विद्यार्थ्यांना अपयश पचवणे सोपे असते पण यश पचवने कठीण असते , अपयशात मार्गदर्शन करू शकतात परंतु यशा मध्ये विद्यार्थी कुठल्याही गोष्टी ऐकण्याच्या मनस्थितीत नसतो , म्हणून विद्यार्थ्यांना यश आणि अपयश पचविण्याचे धडे शिकवावे असे पालकांना उद्देशुन म्हणाले
कार्यक्रमाला मोठ्या संख्येने विद्यार्थी व पालक वर्ग उपस्थित होते , कार्यक्रमाचे संचालन कुमारी कुमुद छत्रपती चौधरी व आभार प्रदर्शन , जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित ,ज्यांच्या जीवनप्रवासावर चित्रपट निर्मिती होणार आहे असे मा . अभय डी रंगारी कवी , लेखक , मुक्त पत्रकार , व अनेक राष्ट्रीय पुरस्काराचे मानकरी यांनी केले , सदर कार्यक्रम परिसरात कौतुकाचा विषय ठरला आहे , भविष्यात असेच नवोपक्रम राबविण्यात येणार आहेत असे संस्थेचे अध्यक्ष मा.स्वप्नील गजभिये यांनी आमच्या प्रतिनिधी ला सांगितले .