आशाताई बच्छाव
वरुड बुद्रुक येथे बिबट्यांचे दर्शन शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण
जाफराबाद जालना प्रतिनिधी मुरलीधर डहाके
भोकरदन तालुक्यातील वरुड बुद्रुक या शहरात गुरुवारी रात्री मिरची राखण्यासाठी गेलेल्या शेतकऱ्यांच्या हाकेच्या अंतरावर बिबट्या दिसल्याने वरुड बुद्रुक येथे भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी सध्याच्या शेतकऱ्यांना तात्पुरता ब्रेक दिला आहे. तरी रोजंदारीवर काम करणारे शेतमजूरही कामावर यायला तयार नाही.त्या भागातील अनेक शेतकऱ्यांना यंदा उन्हाळ्यात पाण्याची योग्य नियोजन करत हिरवी मिरची लागवड केली आहे. मात्र वन्य प्राण्याकडून होणाऱ्या पिकांच्या नासडीमुळे शेतकऱ्यांना रात्रीच्या वेळी राखण करावी लागत आहे वरुड बुद्रुक येथील शेतकरी विजय बावस्कर हे गुरुवारी रात्री आपल्या मुलासोबत मिरची राखण्यासाठी शेतात गेले असता त्यांना अगदी जवळच बिबट्या दिसला बिबट्या तेव्हा काळवीट चा फरशा फाडून त्याचे भक्षण करत होता अशी शेतकऱ्यांना सांगितले ही घटना पाहून त्यांनी तात्काळ घराकडे धूम ठोकली आणि गावातही माहिती सांगितली काही दिवसापासून या परिसरात बिबट्या फिरत असल्याची चर्चा आहे त्यामुळे शेतकरी व शेतमजुरांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. अनेक शेतकऱ्यांनी शेतातील कामे बंद ठेवली असून शेतमजूर कामावर येण्यास नकार देत आहे बिबट्याच्या भीतीमुळे पारध, सावंगी अवघडराव, कोसगाव, पिंपळगाव रेणुकाई ,रेलगाव, करजगाव कल्याणी आदी गावांमधील शेतकरी दहशतीखाली आहे शेतकऱ्यांनी वन विभागाकडे ही बाब गांभीर्याने घेण्याची मागणी केली असून तत्काळ उपयोजना करण्याची गरज व्यक्त केली आहे.