Home जालना काद्राबाद परिसरात महापालिकेकडून पाणी पुरवठा होईना -काद्राबाद परिसरात पाणी वेळेवर सोडवा नसता...

काद्राबाद परिसरात महापालिकेकडून पाणी पुरवठा होईना -काद्राबाद परिसरात पाणी वेळेवर सोडवा नसता शिवसेना रस्त्यावर उतरेल –

75

आशाताई बच्छाव

1001508283.jpg

काद्राबाद परिसरात महापालिकेकडून पाणी पुरवठा होईना
-काद्राबाद परिसरात पाणी वेळेवर सोडवा नसता शिवसेना रस्त्यावर उतरेल –
शहरप्रमुख दुर्गेश काठोठीवाले यांचा इशारा
-महापालिकेला शहर शिवसेनेचे निवेदन
जालना,दि. १५(प्रतिनिधी दिलीप बोंडे)- जालना शहरातील काद्राबाद परिसरात २२-२२ दिवस
महानगर पालिकेकडून पाणी पुरवठा करण्यात येत नसल्याने येथील रहिवाश्यांना
विकतचे पाणी घ्यावे लागत आहे. त्यामुळे नाहक त्रास सहन करावा लागत आहे.
त्यामुळे काद्राबाद परिसराला वेळेवर पाणी सोडण्यात यावा नसता शिवसेना
(उध्दव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या वतीने शिवसेना जिल्हाप्रमुख भास्कर
अंबेकर यांच्या मार्गदर्शनाखाली उग्र आंदोलन छेडण्यात येईल असा
इशार्‍याचे निवेदन शिवसेना शहरप्रमुख दुर्गेश काठोठीवाले यांनी
महापालिकेच्या सहआयुक्त यांना दिले आहे. आज शहर शिवसेनेचे शिष्टमंडळाने
महापालिकेच्या आयुक्ताची भेट घेवून निवेदन दिले.
शिवसेना उपजिल्हाप्रमुख बाबुराव पवार,शहरप्रमुख बाला परदेशी, घनश्याम
खाकीवाले, दुर्गेश काठोठीवाले आदींच्या शिष्टमंडळाने महापालिकेच्या
प्रशासनातील अधिकार्‍यांची भेट घेवून पाण्यासंदर्भात जाब विचारला. तसेच
जालना शहरातील प्रमुख बाजारपेठ असलेला काद्राबाद विभागाला गेल्या २० ते
२२ दिवसांपासून नळाला पाणी येत नाही. कर्मचारी व अधिकार्‍यांना वारंवार
संपर्क करुनही नळाला पाणी येत नाही. नळाला जर पाणी आले तर दुषित पाणी
येते नाही. त्यामुळे रोगराईची भिती निर्माण झाले आहे.  तसेच वेळेवर पाणी
येत नसल्याने याचा सामान्य जनतेला यांचा त्रास होत असून गरीब व होतकरु
लोकांना पाणी विकत घ्यावे लागत आहे. तरी वर्षाला २ हजार ७०० रुपये पाणी
पट्टी करुन ही पाणी वेळेवर सोडले जात नाही. तरी पाणी पुरवठा अधिकारी
यांनी काद्राबाद विभागाला पाणी सोडण्याचे आदेश द्यावे नसता शिवसेना
स्टाईल आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला आहे.

Previous articleनैसर्गिक आपत्तींचा सामना करण्यासाठी यंत्रणांनी मान्सूनपुर्व कामे वेळेत पूर्ण करावीत
Next articleदिव्या सुळसुळेचे यश
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.