आशाताई बच्छाव
देशाच्या स्वातंत्र्यासाठी सर्व प्रथम आद्य क्रांतीवीर राघोजी भांगरे यांचे बलीदान,स्मृती दिनानिमित्त प्रदीप वाघ यांचे प्रतिपादन. पालघर :सौरभ कामडी
मोखाडा तालुक्यातील आदिवासी समाजाचे कार्यकर्त्यांनी
ठाणे कारागृहातील स्मृती स्थळावर जाऊन
सह्याद्रीच्या ढाण्या वाघ आद्य क्रांतीवीर राघोजी भांगरे यांना अभिवादन केले.
यावेळी प्रदीप वाघ यांनी सांगितले की देशाच्या स्वातंत्र्यासाठी लढा देणाऱ्या हुतात्मा मध्ये आदिवासी समाज अग्रभागी होता आणि वीर राघोजी सर्वात आधी शहीद झाला हा खरा इतिहास आहे आणि तो लोकां पर्यंत पोहचला पाहिजे.
आज महाराष्ट्रातील सह्याद्रीच्या कडे कपारीमधील कार्यकर्ते राघोजी चे वारसदार या ठिकाणी आलेले आहेत,या गोष्टी ची सुरवात वंदनीय मधुकर राव पिचड साहेब व डॉ गोविंद गारे साहेब यांच्या मुळे झाली असेही वाघ यांनी सांगितले.
यावेळी प्रदीप वाघ यांच्या सोबत आदिवासी विकास हक्क संघर्ष समिती चे सचिव संजय वाघ, जिल्हा बँक चे संचालक दिलीप पटेकर योगेश खोरगडे सर, विठ्ठल गोडे, नंदकुमार वाघ, देवीदास पेहरे, सुरेश वाघ, मयुर मुकणे महादेव कोळी समाज चिटणीस प्रदीप वारघडे,सुरेश भांगरे सर, संदीप भांगरे,स्वराज पुंडलिक पाटील इत्यादी पदाधिकारी मोखाडा तालुक्यातुन उपस्थित होते.