Home पालघर तालुक्यातील जल जीवन मिशन योजना त्वरित कार्यान्वित करा; सरपंच संघटना

तालुक्यातील जल जीवन मिशन योजना त्वरित कार्यान्वित करा; सरपंच संघटना

155

तालुक्यातील जल जीवन मिशन योजना त्वरित कार्यान्वित करा; सरपंच संघटना

पालघर प्रतिनिधी :सौरभ कामडी

जव्हार :जव्हार तालुक्यात ४८ ग्रामपंचायत व दोन ग्रामदान मंडळात जल जीवन मिशन’ अंतर्गत राबवण्यात येणाऱ्या नळपाणी पुरवठा योजना गेल्या तीन वर्षांपासून अपूर्ण अवस्थेत आहेत.त्यामुळे, तालुक्यातील नागरिकांना तीव्र पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे. शिवाय, उन्हाळी शेती, गुरांना पाणी सारख्या समस्याही उद्भवू लागल्या आहेत.यावर उपाय योजना व्हावी म्हणून,
जव्हार तालुका सरपंच संघटना आक्रमक झाली असून तालुक्यातील नागरिकांना पाणीपुरवठा सुरळीत व्हावा याकरिता मंगळवारी सकाळी 11 वाजता जव्हार तालुका पंचायत समितीचे गटविकास अधिकारी यांना निवेदन देण्यात आले आहे. त्यात, तालुकाभरातील नागरिकांना सुरळीत पाणीपुरवठा झाला नाही तर 23 डिसेंबर रोजी सरपंच संघटनेकडून आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा सरपंच संघटनेचे अध्यक्ष एकनाथ दरोडा यांनी दिला आहे.
शासनाने शेकडो कोट्यवधी रुपये खर्च करूनही या योजना अद्याप कार्यान्वित न झाल्याने ग्रामस्थांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.तथापि,जव्हार तालुका हा दुर्गम व डोंगराळ भाग असून सध्या उन्हाळ्याची चाहूल लागताच अनेक गावांमध्ये पिण्याच्या पाण्यासाठी महिलांना व नागरिकांना मैलोनमैल पायपीट करावी लागत आहे. अनेक गावांमध्ये टँकरद्वारे पाणीपुरवठा करावा लागत असून परिस्थिती दिवसेंदिवस गंभीर होत चालली आहे.
या पार्श्वभूमीवर संबंधित विभागाने तातडीने लक्ष घालून येत्या सात दिवसांत नळपाणी योजनांची कामे सुरू न केल्यास पंचायत समिती कार्यालय, जव्हार येथे दिनांक २३ डिसेंबर २०२५ रोजी तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा सरपंच संघटना, जव्हार यांच्याकडून देण्यात आला आहे.नळपाणी योजना तात्काळ पूर्ण करून ग्रामस्थांना नियमित व शुद्ध पिण्याचे पाणी उपलब्ध करून द्यावे, अशी जोरदार मागणी यावेळी करण्यात आली असून प्रशासनाने वेळीच दखल न घेतल्यास आंदोलनाची तीव्रता वाढवली जाईल, असा इशाराही देण्यात आला आहे.

Previous articleअमरावती मुंबई विमान सेवा आठवड्यातून दोनच दिवस; वेळेतही त्याला बदल.
Next articleएस. टी. भंडारा कार्यालयामार्फत “”निसर्गाच्या सानिध्यात”” सहलीचे आयोजन
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.